वर्दळीचा रस्ता असल्याने फरशा बदलण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत असून विविध चौकांचा विकास करण्यात आला आहे. पण राणी चन्नम्मा चौकाजवळ असलेल्या फुटपाथवरील गटारीची फरशी तुटली असून नागरिकांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. वर्दळीचा रस्ता असल्याने फरशा बदलण्याची मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून फुटपाथ निर्माण करण्यात येत आहे. पण राणी चन्नम्मा चौकातील समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राणी चन्नम्मा चौकाजवळ गणपती मंदिराशेजारील रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पेव्हर्स घालण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी फुटपाथवरदेखील पेव्हर्स घालण्यात आले आहेत. पण याठिकाणी असलेल्या गटारीवरील फरशी घालण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात पादचाऱयांची वर्दळ जास्त असून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी असलेला दिशादर्शक फलकदेखील वाकला असून ये-जा करणाऱया पादचाऱयांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे येथील समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.