समस्यांचा डोंगर तरीही बेळगावकर शांत : नागरिकांनी आवाज उठविणे आवश्यक : प्रशासन-मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग….कोणीही ना आमच्या संग…. असे म्हणण्याची वेळ सध्या बेळगावकरांवर आलेली आहे. पाणी, लाईट, रस्ते, स्वच्छता या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन आणि मनपा दोन्हीही घटक असमर्थ ठरले आहेत. बेळगावकरांची सहनशिलता याला कारणीभूत आहे. निवेदन देऊन प्रश्न सुटत नसतात हे आता नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप आणि हिडकल जलाशयात पुरेसे पाणी आहे. परंतु एलऍण्डटी कंपनीच्या अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारामुळे पाणी पुरवठय़ामध्ये सतत व्यत्यय येतो आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या गळत्या माध्यमांनी जाहीर केल्यानंतरच कंपनीच्या कर्मचाऱयांना जाग येते. शिवाय स्मार्टसिटीच्या कामामुळे गळत्या सुरू झाल्याचे सांगून कंपनी जबाबदारी झटकते.
पाणीपुरवठा होणार नाही याची पूर्वकल्पना अधेमध्ये दिली जाते. परंतु आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाणी केंव्हा सोडणार याची पूर्वकल्पना न देता दुपारी 1 किंवा 4, 5 अशा कोणत्याही वेळी पाणी सोडले जाते. जर घरातील सर्व कुटुंबीय नोकरीसाठी बाहेर गेली असतील तर यावेळेत पाणी भरण्यासाठी अद्याप तरी कोणत्याही कार्यालयातून रजा दिली जात नाही, हे कंपनीच्या लक्षात आणून देण्याची वेळ आता आलेली आहे.
सहसा महिला पाण्याचे नियोजन करतात. प्रामुख्याने नळावरुन त्याच पाणी आणतात. परंतु नोकरदारमहिला नोकरीला जातात तर कामगार श्रमिक घटकातील महिला रोजंदारीला जातात. त्यांना दुपारी घरी येऊन पाणी भरणे कसे शक्मय आहे याचे उत्तर कंपनी देणार आहे का?, महत्त्वाचे म्हणजे पाणी मिळाले नाही तर टँकरसाठी भरमसाठ पैसे मोजणे सर्वांनाच शक्मय नाही.
अधिकाऱयांकडून उद्धट उत्तरे
पूर्वी पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात असमर्थ असले तरी निदान लोकांच्या प्रश्नांना सौजन्याने उत्तरे देत असतं. एलऍण्डटीचा कारभार मात्र त्याही बाबतीत निराशाजनक आहे. एक तर वेळेवर फोन उचलले जात नाहीत. फोन घेतल्यास हेल्पलाईनचा क्रमांक दिला जातो. हेल्पलाईनकडून व्हॉल्वमनचा नंबर दिला जातो. व्हॉल्वमन सुपरवायझरकडे बोट दाखवितो. पण त्याचा क्रमांक दिला जात नाही. त्यामुळे निदान लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
कचरा कायमची डोकेदुखी
महानगरपालिका प्रत्येक सेवेसाठी कर घेते. परंतु नियोजन मात्र शुन्य असते. कचरागाडी कधी येते कधी नाही, या गाडीची वेळही निश्चित नाही. रविवारी सुटी घ्यावयाची असल्यास शनिवारी कोणत्याही वेळी गाडी येते आणि पुन्हा नोकरदारांनी काय करायचे? हा मुद्दा उपस्थित होतो. ज्ये÷ नागरिकांसाठी सुद्धा कर्मचारी वरती येऊन कचरा नेत नाहीत. त्याबाबतही मनपाने विचार करायला हवा.
दिव्याखाली अंधार
शहरातील अनेक पथदीप बंद आहेत. कॅम्पमध्ये तर आनंदी आनंद आहे. याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडे विचारणा केल्यानंतर पथदीप सुरू झाले. परंतु बऱयाचदा कपिलेश्वर ब्रिजवर व अन्यत्र पथदीप बंदच आहेत. दिवसा पथदीप सुरू आणि रात्री अंधार असे चित्र नेहमीच दिसते. या सर्व समस्या असूनही बेळगावकर मात्र कमालीचे शांत आहेत. एक, दोन संघटनांनी निवेदन दिले किंवा आवाज उठविल्याने प्रशासन खडबडून जागेच होणार नाही. त्या-त्या भागातील लोक त्यांना भेडसावणाऱया प्रश्नासंबंधी जोवर आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधणार नाहीत तोपर्यंत बेळगावमधील समस्या कधीच संपणार नाहीत.
स्मार्ट नको पक्के रस्ते द्या
स्मार्टसिटीच्या नावाने तर शहरात समस्यांनी कहर निर्माण केला आहे. एकही रस्ता धड अवस्थेत नाही. सर्वत्र खोदकाम, धुळीचे साम्राज्य, मातीचे ढिगारे, पाऊस पडल्यानंतर होणारा चिखल यामुळे नागरिक वैतागले आहेत. पाऊस पडल्यानंतर नाले आणि गटारी भरुन वाहतात ही सर्व घाण रस्त्यावर येते. त्यामुळे स्मार्टसिटीचे काम थांबवा आणि आधी पक्के रस्ते द्या, अशी मागणी नागरिक करत आहेत. एका भागाचे काम पूर्ण न करता एकाचवेळी सर्व कामे हातात घेतल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा प्रकार झाला आहे. वाहतुकीचा प्रश्न तर अधिकच गंभीर झाला आहे.