प्रतिनिधी/राधानगरी
पावसाने गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिली आहे. तरी धरण पाणलोट क्षेत्रात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. यातच जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यावर्षी दहाव्यादा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धरणाचा एक दरवाजा उघडला असून भोगावती नदी पाणीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
काल, शुक्रवारी रात्री 11.43 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला. यामुळे धरणातील पाणी पातळी 347.43 फूट असून एकूण 2128 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदी पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.