भारतीयांच्या मनावर रामायण आणि महाभारताचा प्रभाव फार मोठा आहे. ‘रामराज्य’ एकटय़ा श्रीरामांमुळे निर्माण झाले का? तर नाही. राजाला त्याचा राज्यकारभार सुविहितपणे, लोककल्याणकारी पद्धतीने करण्यासाठी त्याच तोलामोलाचे मंत्रिमंडळही असावे लागते. राजाला योग्य सल्ला देणारे, प्रसंगी तो चुकत असेल, तर कठोरपणे चार शब्द ऐकवून राजकर्तव्याची जाणीव करून देणारेही असावे लागते. रामायणात एक प्रसंग आहे. महषी विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे यज्ञरक्षणार्थ आणि राक्षसांच्या प्रतिकारासाठी केवळ रामाचीच मागणी केली. ती ऐकून पुत्रप्रेमापोटी राजाला धक्काच बसला. त्याच्या बालवयाची सबब पुढे करून तो विश्वामित्रांना म्हणाला, बालं मे तनयं ब्रह्मन् नैव दास्यामि पुत्रकम्। माझ्या बालवयीन रामाला मी आपणास देणारच नाही! तेव्हा कुलगुरु वसिष्ठा पुढे होऊन कठोरपणे राजा दशरथाला म्हणाले, न धर्मं हातुमर्हसि, न अधर्मं वोढुमर्हसि, तस्मात् रामं विसर्जय। अर्थात धर्माचा त्याग करणे तुला योग्य नाही, अधर्माचे अवलंबन करू नकोस, म्हणून तू रामाला विश्वामित्रांबरोबर पाठव.’ असा राजसत्तेच्या विरोधात कठोरपणे आपला निर्णय दिला. रघुकुलाची, सत्यवचनी असूनही पुत्रमोहापायी वचनभंग करू पाहणाऱया राजा दशरथाची व वर्तमानकाळातील सत्याची प्रति÷ा राखून विश्वामित्रांसारख्या याचकाला वसि÷ांनी प्रसन्न केले. अशा प्रकारे ऋषीसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रे÷ ठरते, तेव्हाच ‘रामराज्य’ जन्माला येते. प्रजाही सुखी समाधानी होते. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळात आपापल्या क्षेत्रात नावाजलेले कारभारी होते, तद्वतच राजा दशरथाच्याही राजसत्तेत अफाट ज्ञानी व आपापल्या विषयात जे अलौकिक असे ऋषिमंडळ होते. रामायणातील बालकांडात त्यांचा तपशील देणारा एक श्लोक आहे. ऋत्विजौ द्वावभिमतौ तस्यास्तामृषिसत्तमौ। वसिष्ठाs वामदेवश्च मत्रिणश्च तथापरे।। सुयज्ञोएप्यथ जाबालि: काश्यपोएप्यथ गौतम:। मार्कंडेयस्तु दीर्घायुस्तथा कात्यायनो द्विज:।।……..अर्थ:- वसिष्ठा व वामदेव या नावाचे दोन श्रे÷ ऋषी हे त्या राजाचे ऋत्विज होते, सुयज्ञ, जाबाली, काश्यप, गौतम, मार्कंडेय आणि कात्यायन हे मंत्री होते. राजा दशरथाचे हे मंत्रिमंडळही आठ जणांचेच आहे. त्यातील वसिष्ठा व वामदेव हे अत्यंत श्रेष्ठा असे सर्वमान्य अधिकारी ऋषी होते. प्रदीर्घ तपश्चर्या, तेजस्वी, मूर्तीमंत वैराग्य व परमज्ञानी असे हे ऋत्विज राजाचे मार्गदर्शक होते. तर उरलेले सहा हे राजाचे वैचारिक नियंत्रक होते. राजाला राष्ट्ररक्षण, प्रजापालन, नि:पक्ष न्यायदान, शत्रूनिर्दालन इ. करताना त्याने स्तुतिपाठक, भाट-चारण, दांभिकांचा मेळा बुद्धिपुरस्सर दूर ठेवला पाहिजे. कारण हे सारे पोटात काहीतरी अपेक्षा ठेवूनच भोवती गोळा होतात. हे जो राजा जाणतो, तोच ‘रामराज्य’ निर्माण करू शकतो!
Previous Article‘कराड जनता’ ठेव परताव्यासाठी ठेवीदारांची केवायसी घेणार
Next Article दिव्याखाली अंधार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.