कोरोना असेपर्यंत जत्रा, यात्रा, समारंभ, उत्सव यांच्यामागे लागून मृत्यूला आमंत्रण देऊ नका!
सध्या मंगळ-राहुचा प्रभाव वाढत आहे. रासायनिक सांसर्गिक रोगांचे कारकत्व या दोन ग्रहांवर आहे. 14 एप्रिलपर्यंत सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. मरणाची भीती न बाळगता लोक सभा, समारंभ, लग्न, मुंज, जत्रा, यात्रा यांच्या मागे लागली आहे. वास्तविक अशा जत्रा, यात्रा, लग्न, वास्तुशांती, जेवणावळी, महाप्रसाद वगैरेना कोरोना संपेपर्यंत अजिबात परवानगी देऊ नये. कारण आमंत्रण मिळाले की जाणे आलेच, पण चुकून जर कुणाला कोरोनाची लागण झालीच तर ते किती महागात पडेल व किती जणांना यमराजाचं आमंत्रण येईल, याचा अंदाजही बांधता येणार नाही. जत्रा, यात्रा, समारंभ, लग्न, मुंज समारंभ वगैरे करणारे करून जातील, पण त्यानंतर जर काही गंभीर परिस्थिती ओढवल्यास त्याची जबाबदारी हे लोक घेणार आहेत का? पूर्वी कुठेतरी एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडायचा पण, हल्ली पाहता एका कुटुंबात चार-पाच लोकांना लागोपाठ कोरोना झाल्याचे वाचनात येत आहे. जिथे मोठय़ा प्रमाणात लोक जमतात तेथे कोरोना हमखास येणारच. जर एखाद्या कुटुंबात कोरोनामुळे एखादा कर्ता पुरुष अचानक दगावला तर त्यांचे हाल काय होतील याचा विचार करा. घरात देव नाहीत का? घरात लक्ष्मी आहे तिला नमस्कार करा, पाया पडा. जत्रेला गेले पाहिजे असे कुठे आहे? जत्रेला जाणाऱयांच्या मनात भक्ती किती असते, हा संशोधनाचा विषय आहे. लग्नाचे आमंत्रण असेल तर शुभेच्छा देऊन नंतर देखील जाऊन भेटता येते, पण मी गेलो नाही तर ते काय म्हणतील? अशी खुळचट कल्पना लोक करून घेतात. सध्या ग्रहमान अतिशय बाधिक व धोकादायक आहे. यमराजाची फिरती सतत सुरू आहे. त्यामुळे कुणाचा नंबर केव्हा लागेल सांगता येणार नाही. त्यासाठी कृपया सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. लस आली म्हणजे कोरोना गेला असे होत नाही. सध्या राहू-मंगळाचा बारीक योगाचा प्रभाव 14 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे आगामी कालखंड सर्व बाबतीत काळजी घेण्यास सूचवीत आहे. क्षुल्लक चूक देखील जिवावर बेतू शकते. कारण महामारी किंवा संकटे सांगून येत नसतात. संकट आल्यावर उपाय करणे हा पुढचा भाग आहे पण, ते संकट येऊ नये यासाठी आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दररोज इतके रुग्ण सापडले, तितके रुग्ण सापडले अशा बातम्या येतात पण ती संख्या खरी नसते. काही जाणकारांच्या मते हा रोग सर्वत्र पसरलेला आहे. शिवाय त्याची तीव्रताही वाढत आहे. या कोरोना संसर्गाच्या काळात स्वतःचा जीव वाचवणे अतिशय महत्त्वाचे आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. ग्रह आपण होऊन कधी कुणाचे वाईट करीत नसतात पण, ते आपल्याला पुढील संकटाची किंवा काही घटनेची चाहूल देत असतात. संकट आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ते संकट येऊच नये यासाठी खबरदारी घेणे हे महत्त्वाचे ठरते. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छता हा मूलमंत्र आहे. त्यामुळे सर्वांनी स्वच्छ राहणे अत्यावश्यक समजावे.
मेष
लाभस्थानी आलेल्या गुरुमुळे आगामी सहा महिन्यात मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. त्यामुळे आर्थिक विवंचना कमी होतील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल, पण स्वतःच्या चुकीमुळे काही बाबतीत मोठे नुकसान सोसावे लागेल. जीवनात काही गुंतागुंतीची प्रकरणे निर्माण होतील. संततीच्या बाबतीत काही नव्या समस्या उद्भवतील. घराण्यात जर पूर्वापार वाद-विवाद, मतभेद अथवा शत्रुत्व असेल तर ते नष्ट होईल. शेजारी व नातेवाईक तसेच आप्तमित्र यांच्याशी संबंध सुधारतील. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना आगामी सहा महिने अतिशय उत्तम जातील.
वृषभ
महत्त्वाच्या केंद्रस्थानी आलेल्या गुरुमुळे नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे आमूलाग्र व चांगले बदल घडतील. वडिलांच्या बाबतीत महत्वाच्या घटना वास्तु आणि वाहन खरेदी वगैरे करण्यास आगामी सहा महिन्याचा कालखंड शुभ आहे. कौटुंबिक सुखात वाढ, घराण्यात जर काही बाधिक दोष असतील तर ते कमी होऊ लागतील. राजकारणात जाण्यासाठी उत्तम काळ. एखादे महत्त्वाचे पदही मिळू शकते. कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुमच्या शब्दाला महत्त्व प्राप्त होईल. दीर्घकाळ स्थगित असलेली काही कामे होऊ लागतील.
मिथुन
भाग्यात आलेल्या गुरुमुळे अनपेक्षितरित्या भाग्य उजळेल. कुटुंबात मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. धार्मिक कामात लक्ष लागेल. मानसिक ताणतणाव कमी होतील, आणि इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतील. दीर्घकाळ संतती नसणाऱयांना अपेक्षित वृत्त समजेल. शारीरिक आरोग्य व मानसिक समाधान लाभल्यामुळे आगामी सहा महिन्याचां कालखंड सर्वबाबतीत यश देणारा आहे. नावलौकिक, प्रसिद्धी, नोकरी-व्यवसायात उच्चपद, आर्थिक भरभराट यादृष्टीने ग्रहमान उत्तम आहे.
कर्क
अष्टमस्थानी आलेल्या गुरुमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कळत नकळत काही चुकीच्या गोष्टी हातून होतील. त्यामुळे अचानक अडचणी निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल पण, त्याचबरोबर नोकरी व्यवसायात प्रगती, घरदार, आर्थिक भरभराट होईल. जिवावरची संकटे टळतील.व्यापार-उद्योगात मोठे लाभ. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा, कर्जफेड यादृष्टीने आगामी सहा महिने उत्तम ठरतील. या गुरुच्या कालखंडात तथाकथित आध्यात्मिक गुरु-महाराजांच्या मागे लागू नका. मनस्ताप होईल व आर्थिक फटका बसेल. तसेच होणारी कामेही खोळंबतील.
सिंह
सप्तम स्थानी आलेल्या गुरुमुळे आरोग्य चांगले राहील. कितीही संकटे आली तरी दैवी कृपेने त्यातून सहीसलामत बाहेर याल. वाढते वय व मंगळदोष अथवा तत्सम कारणाने येणाऱया अडचणी दूर होऊन लग्नकार्य ठरेल. काही बाबतीत थोडीशी तडजोड करावी लागेल. विवाह झाला असेल तर उत्कर्षास सुरुवात होईल. मानसिक रोग, हिस्टेरिया, फिट्स वगैरेपासून जपावे लागेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात असाल तर गुप्तशत्रूंच्या कारवायावर लक्ष ठेवावे लागेल. मुलांच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. कोर्ट प्रकरण असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागू शकेल पण, तुमची बाजू मात्र योग्य हवी.
कन्या
राशीच्या षडाष्टकात येणारा गुरु आध्यात्मिक बाबतीत चांगला आहे. उस्त्रोग-नोकरी, व्यवसाय यात उत्तम आर्थिक प्रगती दिसून येईल. हाती पैसा टिकेल, शिक्षणातील अडचणी कमी होतील. कोणत्या संकटातून कसा मार्ग काढावा, याचे ज्ञान या गुरुमुळे होईल. या गुरुच्या कालखंडात सर्व प्रकारच्या अनिष्ट बाबांपासून दूर राहा. एखादी किरकोळ चूक देखील मोठय़ा संकटाला आमंत्रण देऊ शकते. नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षित नोकरी मिळेल.
तूळ
पंचम स्थानी आलेला गुरु अध्यात्मिक बाबतीत अतिशय शुभ फलदायक आहे. नशिबाच्या बाबतीत शुभ अनुभव येतील. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन व तत्सम किमती वस्तू खरेदी करू शकाल. आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम कालावधी आहे. एखाद्या त्रयस्थाच्या विचित्र वागण्यामुळे संसारी जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकेल. त्यामुळे कोणाशी कसे वागावे याच्या तारतम्याने निर्णय घ्या. अत्यंत महत्त्वाची कामे वेळेवर होतीलच असे नाही, त्यासाठी तशी कामे रखडत ठेवू नका. महत्त्वाच्या दस्तऐवजावर सही करताना फार जपावे लागेल.
वृश्चिक
चतुर्थ गुरु नोकरी-व्यवसाय, वाहन व घरदार या बाबतीत शुभ आहे. तात्पुरती नोकरी असेल तर ती कायम होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी फालतू खेळाकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्या आवडी निवडी तुमच्या पुढील जीवनावर अनिष्ट परिणाम घडवू शकतील. पगारवाढीसाठी अथवा प्रमोशनसाठी प्रयत्न चालू असतील तर त्यात यश मिळेल. राजकारणात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी राहील.
धनु
धनस्थानातून गुरु हटत आहे, त्यामुळे आगामी कालखंडात आर्थिक बाबतीत फार जपून राहावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत असलेली नोकरी सोडू नका अथवा व्यवसाय बंद करू नका. साहित्य, प्रवास, नातेसंबंध भाग्योदय या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. कोर्टमॅटरमध्ये अपेक्षित यश मिळेल. काही नातेवाईक यांच्याकडून घरांविषयी अथवा स्थितीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्मयता आहे. खर्चिक वृत्ती असेल तर वेळीच नियंत्रण ठेवा अन्यथा पुढे अडचणी उद्भवतील.
मकर
धनस्थानी आलेल्या गुरुमुळे आगामी सहा महिन्याचा कालखंड आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम जाणार आहे. कोणतेही मोठे व्यवहार यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळेल. जर काही जुने आर्थिक व्यवहार असतील ते वेळीच मिटवण्याचे प्रयत्न करा. प्रति÷ा अथवा मोठेपणाच्या नावाखाली नको तेथे खर्च करणे टाळा. वैवाहिक जीवनात पूर्वी जर काही घटना घडली असेल तर त्याचा परिणाम यापुढे दिसू लागेल.
कुंभ
तुमच्या राशीत आलेला गुरु जीवनात महत्त्वाचे आमूलाग्र बदल घडविण्याची शक्मयता आहे. एखादे न होणारे काम होऊन जाईल. नावलौकिक व प्रसिद्धी मिळेल. आरोग्य सुधारेल. शनिपिडेचे प्रभाव जाणवणार नाहीत. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर विरोधी पक्षांचे काहीही चालणार नाही. प्रवास, भागिदारी, महत्त्वाचे आर्थिक व्यवहार, देणी-घेणी यासंदर्भातील कामे यशस्वी होतील. तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मीन
राशी स्वामी गुरु अनिष्ट असला तरी आर्थिक बाबतीत तो शुभ फलदायक आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पैशाची अडचण पडणार नाही, पण खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावे लागेल. तुमच्या वागण्या बोलण्याचा कुणीतरी गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. सावध रहा. राशीस्वामी गुरु अनिष्टस्थानी असल्याने हलवाहलवीत महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणे, गुप्तशत्रू कारवायांमुळे मनस्ताप तसेच आध्यात्मिक बाबतीत फसवणूक अशा घटना घडू शकतात. त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे.