सांगली महापालिकेने बांधलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे आज श्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्या निमित्ताने माजी मंत्री ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचा लेख…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रभक्त होत्या. त्या काळात हिंदुस्थानचे केवळ अखंडत्वच नव्हे तर अस्तित्वच धोक्मयात येऊन आज ब्रिटनचे जसे आपण चौदा तुकडय़ात विभाजन झालेले पाहतोय तसे भारताचे देखील तीस-बत्तीस तुकडय़ात विभाजन होऊन प्रत्येक प्रांत (राज्य) हे एक राष्ट्र म्हणून पुढे आले असते तर आपणास नवल वाटले नसते. प्रत्येक राष्ट्राची म्हणून एक वेगळी जिला आपण संस्कृती म्हणतो ती संस्कृती किंवा जीवन पद्धतीनुसार मनुष्य आपले जीवन जगत असतो. त्यामुळे त्या राष्ट्रात राहणाऱया लोकांचे राहणीमान, सणवार, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंत्या-पुण्यतिथ्या याबाबतच्या भावना सर्व साधारणपणे समान असतात.
आपल्या भारत (हिंदुस्तान) देशाची देखील अशीच एक भक्कम उभी असलेली संस्कृती किंवा जीवनपद्धती म्हणा ती आहे. त्यामुळे अनेक भाषा, वेगवेगळय़ा जीवन पद्धतीत, नवनिर्मित श्रद्धास्थाने, त्यामुळे निर्माण झालेले पंथ, आचार-विचारातील बदल यामुळे या देशात अनेकांनी आक्रमणे करून येथील संस्कृती, येथील समाजिक ऐक्मय यावर घाला घालून येथील लोकांचा धर्म व संस्कृती नष्ट करण्याचे अनेक राक्षसी प्रयत्न केले. त्यातील मुख्य भाग होता तो येथील लोकांची श्रद्धास्थाने नष्ट करायची. परकीय आक्रमकांनी हजारो हिंदु मंदिरे उध्वस्त केली. काही प्रमाणात धर्मांतरे घडवून आणली.
होळकरशाहीची सर्व सत्ता जेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातात आली तेव्हा त्यांनी उध्वस्त मंदिरे पुन्हा बांधण्याचा सपाटा लावला. त्यांच्या या कृतीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केवळ आपल्या जहागिरीच्या मुलुखातच उध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा बांधली असे न करता साऱया देशात सुमारे साडेचार हजार मंदिरे पुन्हा बांधली. टीकाकार अहिल्यादेवींच्या या उपक्रमाला धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करतात. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हे कार्य केवळ राष्ट्र पुनर्बांधणी करिता हाती घेतले होते. त्यांची अशी श्रद्धा होती की, गावागावातील मंदिर हे संस्कृती रक्षणाची व प्रसाराची केंदे आहेत. एकोणीस काळाच्या ओघात नष्ट झाल्या व फक्त तीनच संस्कृती जगाच्या पाठीवर जिवंत आहेत. त्या तीनपैकी भारतीय किंवा हिंदू संस्कृती एक शिल्लक आहे याचे कारण गावातल्या देवळामुळे ज्या त्या गावातल्या या लोकांच्या राहणीमानावर या मंदिरातील देवतेवरील श्रद्धेचा परिणाम असतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एकदा हिमालयातील बद्रीनाथाच्या दर्शनाला गेल्या होत्या. तेथील एका उंच शिखरावरून आपल्या हिंदुस्थान देश व त्यांच्या सीमांवर असलेली अन्य तीन धामे अशी चारहीधामे जोडली गेली तर हिंदुस्थानच्या सीमा अधिक स्पष्ट होतील या विचाराने भारून त्यांनी चारहीधामे जोडणारा रस्ता त्या काळात बांधला. हीच कल्पना पंतप्रधान अटलजींनी उचलून आखली व देशातील अधिकाधिक राज्यामधील दळणवळण सुसह्य केले.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे काशीच्या पाण्याची कावड दक्षिणेतल्या रामेश्वराच्या अभिषेकाला जाण्याची व्यवस्था चालू केली. त्यातील मुख्य हेतू हा होता उत्तर-दक्षिण हिंदुस्थानामध्ये भावनिक ऐक्मयाचे वातावरण निर्माण करणे होय. तसेच त्या काळी हिंदुस्थानात चारशे अठ्ठय़ाऐंशी संस्थानांच्या माध्यमातून काही संस्थानचा कारभार हिंदुराज्यांच्या तर काही संस्थानिर्माणचा कारभार मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाती होता. तसेच काही संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात तर काही संस्थाने आदिवासींच्या वर्चस्वाखाली होती. यापैकी कोणी या कावडीच्या वाटचालीस आपल्या संस्थानातून जायला विरोध केला तर तो भारतीय संस्कृतीचा विरोध समजून त्याची समजूत काढून कावडीचा मार्ग सुखकर करणे, हे कोणी नाही ऐकले तर त्या संस्थानचा बिमोड करून तेथे भारतीय संस्कृतीची विचारधारा पुर्नस्थापित करणे अथवा तो प्रदेश आपल्या ताब्यात घेणे असा दरारा निर्माण केला होता. त्यामुळे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नैतिक धार्मिक जीवनावर आदर व्यक्त केला जात असल्यामुळे कोणीही या कावडीला विरोध केला नाही.
सन 1786-87 मध्ये लालसोट येथे सर्व राजपूत एकत्र येऊन शिंद्यांचा दारुण पराभव केला. या विजयाने चेकाळलेल्या राजपुतांना आकाश ठेंगणे वाटू लागले. राजपुतांना मेटाकुटीस आणलेल्यांचा कायमचा बिमोड करायचा ठरवून सारे राजपूत एक होऊन होळकरांचे एक-एक ठाणे हस्तगत करायचा सपाटा लावला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पेटून उठल्या आणि राजपुतांची खोड मोडण्याच्या इराद्याने शरिफभाईंच्याकडे सेनापतीपद देऊन जय्यत तयारीने राजपुतांना कायमचा धडा शिकवण्यासाठी अहिल्यादेवी तयारीस लागल्या. शरीफभाईच्या माऱयाने हैराण होत राजपूत सैन्य रामपूऱयाला आश्रयाला आले होते. राजपुत सैन्य तिथून पळत सुटले व आमदेच्या भक्कम तटबंदीच्या किल्ल्याच्या आश्रयाला आले. त्यांचा पाठलाग करत येऊन आमदेच्या किल्ल्याला वेढा दिला. तीन महिने टाकलेल्या वेढय़ाला यश येत नाही असे पाहून शरीफभाईने अहिल्यादेवींना निरोप पाठवला,‘ आम्ही माघारी फिरावे काय?’ यावर अहिल्यादेवींनी प्रतिउत्तर पाठवले, ‘धीर सोडू नका, किल्ला हाती घेऊनच मागे यायचे आहे.
मजल दर मजल करीत ज्वाला तोफेसह अहिल्यादेवी आमदेला पोहोचल्या. शोभासिंग जिवंत हाती लागला. त्याला मातोश्रींनी तोफेच्या तोंडी देऊन त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. दहा-अकरा दिवसाने भवानीसिंगास पकडण्यात मराठय़ांना यश आले. त्यालाही तोफेच्या तोंडी दिले. या प्रतिहल्ल्याने राजपुतांची एवढी गाळण उडाली की पुन्हा त्यांनी मराठय़ांची कळ काढली नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पराक्रमामुळे शिवरायांचा भगवा झेंडा अभिमानाने राजपुतान्यात फडकत राहिला. त्यास हटवण्याचे धाडस पुढे कोणी केले नाही.