काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे यांचे प्रतिपादन : शहरात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ-स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा को-ऑपरेटिव्ह बँक जशी 79 वर्षांहूनही अधिक काळ तळागाळातील जनतेची आर्थिक उन्नती करण्यासाठी कार्यरत आहे. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी समाजासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी आणि स्वामी विवेकानंदांसारखे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आणि आझादी का अमृतमहोत्सव ते शतकोत्सवाकडे देश नेण्यासाठी जिजाऊंचे संस्कार ही काळाची गरज आहे, असे विचार काकडे फौंडेशनचे अध्यक्ष व विवेकानंद केंद्र कार्यकर्ते किशोर काकडेंनी व्यक्त केले.
बसवाण गल्लीतील मराठा को-ऑप. बँकेच्या सभागृहात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रारंभी शिवछत्रपतींच्या मूर्ती पूजनासह राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्याही प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना बाळासाहेब काकतकर यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. चेअरमन दिगंबर पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. तर व्हाईस चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले.
देशभक्तीपर गीतांसह किशोर काकडेंनी राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्या कार्याची आजची आवश्यकता, आर्थिक प्रगती करताना झालेली नैतिक अधोगती व आपल्या सर्वांची जबाबदारी यावर विचार मांडले. तसेच बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बँकेतर्फे शाल, श्रीफळ, मिठाई देऊन काकडेंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे संचालक बाबुराव पाटील, विश्वनाथ हंडे, विनोद हंगिरकर, रेणू किल्लेकर, सभासद शिवाजी हंडे, शिवाजी हंगिरकर, सुहास किल्लेकर, श्रीकांत देसाई, दिनकर घोरपडे, संजय काकतकर, दीपक गायकवाड, डी. के. पाटील, मॅनेजर संतोष धामणेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
आरपीडी महाविद्यालय
आरपीडी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी संपदा कट्टी, श्रीनिधी राव, श्वेता हंदिगोळ, धवलश्री सरदेसाई, अनुष्का शंकरगौडा या विद्यार्थिनींनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांच्यासह डॉ. राजेंद्र पोवार, प्रा. एस. एस. शिंदे, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, प्रा. विजयकुमार पाटील, डॉ. एस. एस. कुरणी, डॉ. एस. आय. कितली, ऑफिस अधीक्षक एस. एस. चिकमठ यांनी विवेकानंद व जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे सचिव मयूर कदम यांनी आभार मानले.
मराठा मंदिर
इच्छा असूनही आपण राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती कोरोनामुळे मोठय़ा उत्साहात साजरी करू शकत नाही. पण तरीही त्यांचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच यंदाही आम्ही साधेपणाने या दोन महान व्यक्तींची जयंती साजरी करीत आहोत, असे विचार मराठा मंदिरचे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.
मराठा मंदिरतर्फे बुधवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची 425 वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 160 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी चंद्रकांत गुंडकल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ज्येष्ट संचालक लक्ष्मणराव सैनूचे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेचे तर सेपेटरी बाळासाहेब काकतकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संचालक नारायण नागेश तरळे यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर गुरव व काकतकर यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी संचालक शिवाजी हंगिरगेकर, नेताजी जाधव, विश्वास घोरपडे आदी उपस्थित होते. संचालक नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी व्यवस्थापक डी. एम. ढोबले, अनिल जांबोटकर व महेश मोरे उपस्थित होते.
पतंजली योग समिती-मराठा मंडळ ज्युनियर कॉलेज
पतंजली योग समिती व मराठा मंडळ ज्युनियर कॉलेजतर्फे स्वामी विवेकानंद व जिजामाता यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम मराठा मंडळ कॉलेजमध्ये पार पडला. प्राचार्य एस. एस. पाटील व मगनभाई पटेल यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. किरण मन्नोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्वामी विवेकानंद व जिजामाता ज्यांच्यामुळे आपल्या देशाच्या संस्कृतीचे जतन झाले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आज तरुण पिढीने आचरण केले पाहिजे. मानवतेची सेवा, राष्ट्रप्रेम हाच त्यांचा खरा धर्म होता. असे ते म्हणाले.
दीपक पानसरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे वाङ्मय आज मोबाईल किंवा लायब्ररीतून आपणास उपलब्ध आहे. त्याचे अध्ययन करून तरुण पिढीने आपल्या आचरणात आणले पाहिजे. यामुळेच भारत विश्वगुरु बनू शकेल, असे त्यांनी सांगितले. अंजली गाडगीळ म्हणाल्या, स्वामी विवेकानंद किंवा जिजामाता यांनी स्वतःपुरता विचार कधीच न करता एखाद्या वृक्षाप्रमाणे संपूर्ण समाजाला सावली, आश्रय दिला हे विश्वची माझे घर याची प्रचिती दिली. एस. एस. पाटील म्हणाले, या महान पुरुषांची जयंती खऱया अर्थाने तेव्हाच साजरी होईल, ज्यावेळी त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण करून समाजाची, देशाची सेवा करू, मोहन बागेवाडी यांनी प्राचार्य एस. एस. पाटील, चंद्रकांत गोमाण्णाचे, पी. ई. शिक्षक, पतंजलीच्या सर्व सभासदांचे आभार मानले. यानंतर सूर्यनमस्कार घालण्यात आले. शांतीपाठाने या कार्यक्रमाची सांगता झाली. पुरुषोत्तम पटेल, रमेश पाच्छापुरे, चंद्रकांत खंडागले, ओ. एफ. गौडा, रुपा खोदानपूर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद वेल्फेअर असोसिएशन
स्वामी विवेकानंद वेल्फेअर असोसिएशन आणि सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे स्वामी विवेकानंद कॉलनीमध्ये स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
नगरसेवक ब्रम्हानंद मिरजकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सी. ए. आहुजा यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी विक्रम पुरोहित, स्वामी विवेकानंद वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण गोडसे, सेपेटरी संतोष कागवाडे, नितीन निंबाळकर, दीपक पाऊसकर, स्टेफीन डीकोस्टा, राजशेखर हिरेमठ, सुनीता हणमशेठ, श्रीकांत ओऊळकर, नितीन गोडसे, मंगेश देवलापूरकर व कॉलनीतील इतर नागरिक उपस्थित होते. अध्यक्ष बाळकृष्ण गोडसे यांनी आभार मानले.
महिला आघाडी
महिला आघाडीच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर होत्या. प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या, मोगलांच्या तावडीतून आपल्या रयतेला सोडविण्यासाठी शिवराय अविरत झटले. कारण तसे बाळकडू त्यांना जिजाऊंनी दिले होते. त्यांचे स्मरण करणे हे प्रत्येक महिलेचे कर्तव्य आहे.
सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. मंजू कोळेकर यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्त्या भाग्यश्री जाधव, आशा सुपली, अर्चना कावळे, अर्चना देसाई, राजश्री बडमंजी, राजश्री बांबुळकर, श्रद्धा मंडोळकर, आशा व शामिनी पाटील, रेखा गोजगेकर, माला जाधव, धनश्री व अन्य महिला उपस्थित होत्या.
युवा समितीतर्फे विवेकानंदांना अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. म. ए. युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी म. ए. युवा समितीच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी म. ए. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम म्हणाले की, आपले सहकारी आज तुरुंगात असताना आपण कोठेही आपल्या कार्यात कमी पडणार नाही आणि आम्हाला जे संयुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे आहे. त्या ध्येयास राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्याकडून शक्ती आणि ऊर्जा आम्हास मिळू दे, तसेच कोणतेही कार्य अडथळय़ांवाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यशाची प्राप्ती होते. हे विवेकानंदांचे विचार आम्हाला आमचे ध्येय गाठण्यास प्रेरणा देतील. अनेक अडथळे आमच्यावर येत राहतील त्यांचा आम्ही जिद्दीने सामना करू आणि आपले ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, विनायक कावळे, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, ओंकार पाटील आदी म. ए. युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.