मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजपाकडून राहुल गांधींना वारंवार लक्ष्य केलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत, टीका करत आहे. ट्वीटवर ट्वीट करत त्यांनी देशात असलेली कोरोना स्थिती, केंद्र सरकारची भूमिका यावर निशाणा साधला आहे. यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोपाची मालिका सुरूच असते. आता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अमरावतीमधील नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील भाजपवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी दोन ओळीचे ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी हिंदीमध्ये ट्वीट करत म्हटले आहे की, “राहुल गांधी एकलौते ऐसे नेता है, जिनका अस्तित्व और प्रभाव नाकारते नाकारते भाजपा आज उन्ही से डरकर छुपी रहती है. ये डर अच्छा है”. राहुल गांधी यांचे अस्तित्व भाजप नाकारत नाकारत आता त्यांनाच घाबरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत लसीकरणावरून पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लसीची कमतरता लपविण्यासाठी भाजपने रोज खोटं बोलणं आणि पोकळ आश्वासन देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रियांका गांधी देखील देशातील कोरोन स्थिती, लसीकरण यावरून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात