वृत्तसंस्था / मुंबई :
आशियातील सर्वात धनाढय़ म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची ओळख आहे. परंतु आता याच रिलायन्सने 200 अब्ज डॉलर्सच्या बाजारमूल्यासोबत देशातील सर्वोच्च कंपनी होण्याचा मान पटकावला आहे. गुरुवारी शेअर बाजारात समभागामध्ये मोठय़ा प्रमाणात तेजी नोंदवल्याने ही उंची प्राप्त करण्यात कंपनीला यश मिळाल्याचे पहावयास मिळाले आहे.
मुंबई शेअर बाजारात कंपनीचे समभाग सहा टक्क्मयांपेक्षा अधिकने वधारुन 2,343.90 या विक्रमी पातळीवर बंद झाल्याची नोंद केली आहे. यामुळे कंपनीचे बाजारातील भांडवल 14,14,764.90 कोटी रुपये म्हणजे 192.85 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे.
अमेरिकेची कंपनी सिल्वरलेकने बुधवारी रिलायन्सच्या रिटेल प्लॅटफॉर्मवर 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. यासोबतच चालू वर्षात कंपनीचे समभाग 47 टक्क्मयांपेक्षा अधिक अंकांनी तेजीत राहिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अन्य कंपन्यांकडून गुंतवणुकीचा कल वाढत गेल्यास त्याचा लाभ रिलायन्सला होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.