परराज्यातील प्रवाशांचा खुलेआम शहरात प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे रस्तेमार्गाने कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर नसल्याने माघारी धाडले जात आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वेने येणाऱया परराज्यांतील प्रवाशांना कोणत्याही तपासणीविना सोडले जात आहे. केवळ रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर तपासणीचा फार्स सुरू असून इतर दोन मार्गांनी प्रवासी स्थानकातून बाहेर येत आहेत. त्यामुळे रेल्वे अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे शहरवासियांचा जीव धोक्मयात आला आहे.
बेळगाव रेल्वेस्थानक हे देशातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध असल्यामुळे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. कोरोनाच्या वाढत्या धोक्मयामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी सक्तीची केली आहे. त्यामुळे रस्तेमार्गाने येणाऱयांना आरटीपीसीआर करूनच बेळगावमध्ये यावे लागत आहे. ज्यांच्याजवळ असे प्रमाणपत्र नाही त्यांना माघारीही धाडण्यात आले आहे.
रेल्वेस्थानकावर आरटीपीसीआर तपासणीसाठी कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु हे कर्मचारी मुख्यप्रवेशद्वारातून येणाऱया प्रवाशांची नावनोंदणी तेवढीच करून घेत आहेत. रेल्वे आल्यानंतर शेकडो प्रवासी एकाचवेळी स्थानकात येत असल्यामुळे कोणतीही तपासणी न करताच त्यांना सोडले जात आहे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी दोन ते तीन मार्ग असून या मार्गावरून प्रवासी कोणतीही तपासणी नसताना थेट रेल्वेस्थानकातून बाहेर निघत आहेत.
रेल्वे कर्मचारी व अधिकाऱयांच्या डोळेझाकपणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. बाहेरून येणाऱया प्रवाशांची कोणतीच तपासणी केली जात नसल्यामुळे आजारी असणारे रुग्णही शहरात येत आहेत. एकीकडे जिल्हय़ातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अशाप्रकारे निष्काळजीपणा करणे धोक्मयाचे ठरणार आहे.