मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स नियमांचे पालन
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन मध्ये गरीब-गरजुंची उपासमार होवू नये म्हणून सरकारने मोफत रेशन धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार रेशन दुकानात धान्य उपलब्ध झाले आहेत. हे धान्य खरेदी दुकांनावर रांगा लागल्या आहेत.
रोजगार नसल्यास आर्थिक संकट सर्वसामान्य व मध्यवर्गीयापेक्षा गरीब-गरजुवर जास्त कोसळले आहे. घरात धान्य नसल्याने रोजच उपासमार सुरू आहे. ही उपासमार थांबावी म्हणून सरकारने रेशन धान्य मोफत देण्यास सुरूवात केली आहे. हे धान्य शहरातील रेशन दुकानांत उपलब्ध झाले आहे. यामुळे लाभार्थी दररोज दुकानात सकाळपासून रांगा लावत आहेत. यावेळी मास्क, सॅनिटायझर, आणि सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येत आहे. तसेच गर्दी होवू नये म्हणून लाभार्थ्यांचे नाव व नंबर लिहून घेवून त्यांना रेशन देण्यात येत आहे.