ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीमधील घाघरा नदीमध्ये दोन बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एका बोटमधील 10 तर दुसऱ्या बोटमधील 15 असे 25 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.
ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या घाघरा नदीच्या दुसऱ्या बाजुला शेती असल्याने तेथील लोक जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी नेहमीच जात असतात. आज अशाच प्रकारे लोक बोटीने जात असताना नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बोट पलटी झाली. या दुर्घटनेत बोटमधील 10 जण बेपत्ता झाले आहेत. तर मटेराजवळ झालेल्या अशाच प्रकारच्या दुसऱया दुर्घटनेत 15 जण बेपत्ता आहेत. पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्याला वेग आला आहे.