राधानगरी / प्रतिनिधी
लग्न लावून देत आर्थिक फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील तिघांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, विवाह लावून देऊन आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी विक्रम केशव जोगम वय वर्ष 25 रा, म्हासुर्ली पैकी जोगमवाडी ता, राधानगरी याने या संदर्भात राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या बाबत राधानगरी पोलिसांकडून माहिती अशी की, फिर्यादी विक्रम जोगम याचा विवाह 22 जून 2021 रोजी म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे रा, तारदाळ, ता, हातकणंगले हिच्याशी करण्यात आला होता. या विवाहाच्या वेळी तिचा पती संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबू शेख, व समिना फिरोज शेख रा, शाहूनगर, चंदूर, सद्या, रा, जवाहरनगर, इचलकरंजी हे सर्वजण उपस्थित होते. या सर्वांनी फिर्यादी कडून सुमारे एक लाख पाच हजार घेतले, दरम्यान हा विवाह करताना आधी लग्न झाल्याची माहिती लपवून ठेवली होती, व ती रक्कम आपापसात वाटून घेतली, त्यानुसार या चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या नुसार चौघांना इचलकरंजी येथुन पोलीस निरीक्षक आपोसो कोळी, उपनिरीक्षक नजीर खान, पोलीस, सुरेश मेटील, प्रमोद पाटील व भाग्यश्री राख यांनी ताब्यात घेतले, या संदर्भात या आरोपीकडून आणखीन फसवणूकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, या संदर्भात कोणाची आणखी फसवणूक झाली असल्यास राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक आपासो कोळी यांनी केले आहे.