ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावादाला भारतच जबाबदार आहे, असा आरोप चीनने भारतावर केला आहे. तसेच चिनी सैन्य त्यांच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी पूर्णणे कटिबद्ध आहे, असेही चीनने म्हटले आहे.
रशियात शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगे यांच्यात सीमावादावर चर्चा झाली. त्यानंतर चीनने एक निवेदन जारी केले आहे. चीनने निवेदनात म्हटले आहे की, लडाखमधील वाढत्या तणावाला भारत जबाबदार आहे. चिनी सैन्य त्यांच्या रक्षणासाठी सज्ज आहे. चीन आपली एक इंचही जमीन सोडणार नाही. तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील संरक्षण प्रमुखांनी एकत्रित मोकळेपणाने बोलले पाहिजे.
भारत-चीनमधील वाढता सीमावाद चर्चेतून सोडवला गेला पाहिजे. दोन्ही देशात आतापर्यंत झालेले करार प्रामाणिकपणे पाळले गेले पाहिजे, असेही चीनने निवेदनात म्हटले आहे.