घरोघरी राबविणार मोहीम : जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या : सर्व जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 7 नोव्हेंबर रोजी लाळय़ाखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन जनावरांना लस टोचली जाणार आहे. लाळय़ाखुरकतला आळा घालण्यासाठी पशुसंगोपनमार्फत ही मोहीम सक्रियपणे राबविली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात लाळय़ाखुरकत लसीकरण मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ती सक्रियपणे राबविता आली नव्हती. मात्र यंदा कोरोना संकटानंतर जिल्हय़ातील प्रत्येक जनावरांपर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणार आहे. जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, गाढव, कुत्रा, घोडा, मांजर यांचा समावेश आहे. या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे.
खबरदारी म्हणून लसीकरण
लम्पी संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रोगाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे. त्यामुळे लाळय़ाखुरकत लसीकरण लांबणीवर पडली होती. मात्र आता लम्पी आटोक्मयात आला आहे. त्यामुळे जनावरांना लाळय़ाखुरकत होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून लसीकरण केले जाणार आहे.
लाळय़ाखुरकत विषाणूजन्य असल्याने झपाटय़ाने होतोय फैलाव
लाळय़ाखुरकत हा विषाणूजन्य असल्याने झपाटय़ाने फैलावतो. या रोगाची लागण झाल्यास जनावरांच्या तोंडाला फोड उठून जखमा होतात. परिणामी जनावर अशक्त बनून दूध क्षमता कमी होते. त्यामुळे पशुपालकांना फटका बसू शकतो. यासाठी खबरदारी म्हणून सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळय़ाखुरकत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
लम्पीतून बऱया होणाऱया जनावरांची संख्या अधिक
बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पीची लागण झालेली जनावरे अधिक प्रमाणात आढळून आली आहेत. दरम्यान समाधानकारक बाब म्हणजे लम्पीतून बऱया होणाऱया जनावरांची संख्या देखील अधिक आहे. मात्र लम्पीने दगावलेल्या पशुपालकांना मोठा फटका बसला आहे.
काही पशुपालकांनी आपल्या जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नाही. अशा शेतकऱयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाळय़ाखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शेतकऱयांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱयांनी सहकार्य करणे गरजेचे
जिल्हय़ात 7 नोव्हेंबरपासून लाळय़ाखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन जनावरांना लस टोचली जाणार आहे. शेतकऱयांनी यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.
-शशिधर नाडगौडा (सहसंचालक पशुसंगोपन )