अचूक बातमी “तरुण भारत” ची, रविवार, 23 मे 2021, सकाळी 11.20
● शनिवारी रात्री अहवालात 2,083 बाधित ● लाट स्थिर राहतेय, संपणार कधी? ● पॉझिटिव्हिटी रेट थोडा खाली घसरला ● पॉझिटिव्हिटी रेट आला 17.22 वर ● एकूण नमुने तपासले 1,2097 ● लसीकरण गती मंदावली ● आता पुन्हा कडक लॉकडाउनचा उतारा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात लॉकडाऊनला दीड महिना होत आला. मात्र, लॉकडाऊन केल्यानंतरच जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत गेली आहे. गेल्या काही दिवसात बाधित वाढीचा वेग मंदावत आना दिसत असला तरी तो आता दोन हजारांवर स्थिर झाला आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देत असली तरी हा बाधित वाढीचा रोजचा रतीब कधी बंद होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. शनिवारी रात्रीच्या आवाजात 2,083 जणांचा अहवाल बाधित आला आहे.
बाधित वाढ, मृत्यूसत्र थांबणार कसे?
लॉकडाऊन होण्याच्या अगोदर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती एवढी गंभीर नव्हती मात्र नंतर ज्या पद्धतीने बाधित वाढीचा वेग वाढला आणि पुन्हा जिल्हा पॅनिक झाला आहे. तपासण्यांचा वेग वाढवला कसा बाधित वाढीचा ही वेग वाढला जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हाय आहे. तर बाधितांच्या मृत्यूसत्राने जिल्हा हादरून गेला आहे. गेल्या चार-पाच दिवसात बळींची संख्या कमी झाली असली तरी ती 30 वर स्थिर आहे. नेमके हीच बाधीत वाढ आणि मृत्यू सत्र थांबणार कधी याकडे सर्वांचे डोळे लागलेत.
औषधांच्या दुष्परिणामातून म्युकरमायकोसिस
कोरोना बरा करण्याचे औषध अद्याप मेडिकल सायन्सकडे उपलब्ध नाही. सध्या रुग्णावर न्यू साठी वापरण्यात येणाऱ्या औषध आणि अँटोबायोटीकचे प्रयोगच करून उपचार सुरू आहेत. त्यातील काही औषधांचा दुष्परिणाम होत असल्याने म्युकर मायकोसिस नावाचा नवीन प्रकार आता जिल्ह्याला छळू लागला आहे. मात्र त्यातून देखील रुग्ण बरे होत असल्याचा दिलासा असला तरी आता प्रशासनाने लसीकरणाबाबत ठामपणे निर्णय घ्यावा आणि ही लढाई बंद करावी, अशी लोकांची मागणी आहे. कारण कोणावर करण्यात येणाऱ्या उपचाराने नवीन ही ब्याद येत असेल तर त्यापेक्षा लसीकरण केलेले कधीही चांगले होईल, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.
पुन्हा कडक लॉकडाउन
या लॉकडाउन शब्दांचा आता नागरिकांना देखील कंटाळा आलाय. अंशतः लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन हे गेल्या वर्षात सगळं काही करून झालेला आहे. असं असताना देखील पुन्हा जिल्हात कोरोना संसर्गाच्या कडाक्यात लोक सापडले आहेत. नागरिक नियम पाळतच आहेत. काही नागरिक नियम पाळत नसतीलही मात्र लॉकडाऊन करून संसर्ग कमी झाला आहे असं काही समोर येत नाही. आता पुढील सहा दिवस पुन्हा कडक लॉकडाऊन पाळून ही जंग पुढे सुरू ठेवायचे आहे असं प्रशासनाचं मत आहे.
शनिवारी रात्री अहवालात 2,083 बाधित
दोन हजारांच्या पटीत सुरू असलेली बाधित वाढ जिल्हावासीयांना अध्याप छळतच आहे. होती. गेल्या दोन दिवसात ती अठराशे खाली आली. गती मंदावल्याचा दिलासा असतानााच शनिवारी रात्रीच्या पुन्हा दोन हजाराच्या पुढे संख्येने बाधित समोर आले आहेत. या अहवालानुसार एकूण 12,097 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,083 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 17.22 असा खाली घसरला आहे.
लसीकरणाला गती देण्याची गरज
जिल्हय़ात आता लसीकरणाचे नियम बदलून टाकले आहेत. कोव्हॅक्सिन तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येतेय तर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरु आहे. सहा लाखाच्या वरती जिल्ह्यात लसीकरण पूर्ण झालेले आहे मात्र कोरोना बाधितांटावर उपचार करण्यात येणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम म्युकरमायकोसिस च्या रूपाने पुढे येत असतील तर त्यापेक्षा शासनाने लसीकरण मोहीम गतीने राबवावी, अशी मागणी होत आहे.
शनिवारी बाधित….1,878 मृत….31 मुक्त…..1,633
शनिवारपर्यंत एकूण नमुने…6,72,792 एकूण बाधित….1,46,656 घरी सोडण्यात आलेले…1,25,433 मृत्यू….3,390 उपचारार्थ रुग्ण….17,820