प्रतिनिधी / ताळगांव
ताळगांव हे कृषीप्रदान गाव म्हणून ओळखले जाते. येथे मोठय़ाप्रमाणात भाज्यांची शेती होत असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात या गावठी भाज्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. राज्यात बेळगाव सारख्या शहरातून भाजी येत आहे, परंतु बेळगावात अनेक कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने अनेक जणांनी या भाजीपाल्याकडे पाठ फिरवीली आहे व ते गावठी भाज्यांना प्राधान्य देत आहे.
ताळगांव येथे अनेक शेतकरी रस्त्याच्या बाजुला भाजी विकताना दिसत आहे. ताळगांवात हमखास गावठी भाजी मिळते अशी धारणा अनेक जणांची झाली आहे. त्यामुळे सकाळी, सायंकाळी भाजी घेण्यासाठी अनेकजण गर्दी करताना दिसतात. त्यामुळे या शेतकऱयांना देखील या लॉकडाऊनच्या काळात कमविण्यासाठी शेतीचा तरी आधार मिळत आहे.
अनेक भाज्यांचे दर वाढले
लॉकडाऊनमध्ये चांगल्या दर्जाची भाजी ताळगांवात मिळत असते. परंतु सध्या अनेक भाज्यांचे दर वाढले आहे. आधी 20-30 रुपये दरात मिळणाऱया अनेक भाज्या सध्या 50रुपयेपेक्षा अधिक विकली जात आहे. यामध्ये खासकरुन तांबडी भाजी, मुळाभाजी, पालकभाजी, वांगी, भेंडी यांचा समावेश आहे.
सध्या ताळगांव येथे असणारी शेतातल्या भाजीलाप्याचा हंगाम पाऊस सुरु होण्यामुळे संपण्यात येत आहे, त्यामुळे आता पावसात डोंगरावर शेती करण्यावर सर्वांचा भर असतो. यादरम्यान भेंडे, काकडी, तांबडीभाजी, खरडी, चिबुड, घोसाळी यासारख्या भाज्यांची लागवड केली जाते.
ताळगांवातील गावठी भाजीपाल्यांचे दर खालीलप्रमाणेः
मोठी वांगी- 50 रु. नग
चिटकी- 20 ते 30 रु. वाटा
मिरची- 20 रु. वाटा
भेंडी- 50 रु. वाटा
कणगा- 100 रु. वाटा
कोकण दुधी- 30 रु. नग
तांबडीभाजी- 50 रुपयेला 3-4 जुडी
पालकभाजी- 50 रुपयेला 3-4 जुडी
मुळा – 50 रुपयेला 3-4 जुडी
मोठे नारळ- 50 रु. नग
मध्यम नारळ- 35 रु. नग
आंबे- 500 ते 850 रु. डझन