असंघटीत क्षेत्रात मिळणार नोकरीच्या संधीः व्यवहार पूर्ववत होण्याचा फायदा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत असून देशभरातील अनेक राज्यात लॉकडाऊन मागे घेतला जात आहे. पद्धतशीरपणे लॉकडाऊन मागे घेतला गेल्यास असंघटीत क्षेत्रात अंदाजे 1 कोटी 7 लाख जणांना पुन्हा नोकऱया उपलब्ध होतील असा अंदाज सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) यांनी व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर असंघटित क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. जानेवारी 2021 नंतर या क्षेत्रात बिगर कृषीसंबंधीत रोजगारात 3.68 कोटींची कपात झाली आहे. ‘मे’मध्ये फिरते विपेते, रोजंदारी मजूर व इतर छोटय़ा व्यावसायिक अशा 1.7 कोटी जणांनी रोजगाराच्या संधी गमावल्या आहेत.
जून महिन्यामध्येही रोजगारात घट झाली आहे. कोरोना महामारीअंतर्गत लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, आस्थापने बंद राहिली आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. 6 जूनला संपलेल्या आठवडय़ात बेरोजगारीचा दर वाढून 13 टक्केवर पोहोचला आहे. पण येणाऱया काळात अनलॉकला सुरूवात होऊन व्यवसाय, आस्थापने सुर करण्यास मुभा दिल्यास पुन्हा रोजगाराच्या संधीत वाढ होईल, असे सीएमआयई यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी लॉकडाऊन काही जिल्हय़ांमध्ये मागे घेतला असून व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. काहीबाबतीत 50 टक्के उपस्थिती मर्यादा ठेवत मॉल, हॉटेलसारखे व्यवसाय करण्यास मान्यता देण्यात आल्याने अनेकांना पुन्हा नोकरीवर बोलावलं जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास सुरूवात होणार आहे.