रत्नागिरी / प्रतिनिधी
कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे लोक कलावंताना मोठा फटका बसला. याची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. स्वतः कोरोनाने आजारी असताना देखील तालुक्यातील जाखडी, भजन, नमन मंडळांशी संवाद साधत त्यांना मदतीचा हात दिला आहे. यानुसार तालुक्यातील ५५ सक्रीय जाखडी मंडळे यांना १० हजाराची मदत तर वर्षातून एकदा कार्यक्रम करणाऱ्या १५ मंडळांना ५ हजाराची मदत स्वतःकडून करण्याचा निर्णय ना. सामंत यांनी घेतला आहे.
तसेच तालुक्यातील ११७ नमन मंडळे व ९५ भजन मंडळे यांना देखील प्रत्येकी दहा हजाराची मदत देण्यात येणार आहे. दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय येथे जाखडी मंडळांना, दुपारी १ वाजता दैवद्न भवन येथे भजन मंडळ तर सायंकाळी ४ वाजता जठार हॉल हातखंबा येथे नमन मंडळांना ही मदत दिली जाणार आहे.