प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाबाबत अज्ञान असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी लोकमान्य सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खानापूर तालुक्मयातील दुर्गम गावांमध्ये फौंडेशनचे काम सुरू आहे. अजून ज्या गावांमध्ये सरकारी यंत्रणाही पोहोचल्या नाहीत त्या गावांमध्ये लोककल्प फौंडेशनने जागृतीचे काम सुरू ठेवले आहे.
खानापूर तालुक्मयातील कणकुंबी विभागात येणाऱया हंदीकोपवाडा येथे फौंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच भेट दिली. तेथील नागरिकांना एकत्रित करून त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱया औषधांचे वितरण करण्यात आले. बेळगावचे डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या आयुर्वेदिक औषधांचे नागरिकांना महत्त्व पटवून देऊन त्याचे सेवन करण्याचे आवाहन करण्यात आले.
फौंडेशनचे सदस्य किरण गावडे नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांमध्ये अजून अज्ञान असल्याने त्यांच्यामध्ये भीती आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्यास भीतीने ती लपवली जात आहेत. मात्र, असे न करता भीती बाजूला ठेऊन नागरिकांनी औषधोपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. कोणतीही गरज भासल्यास नागरिकांनी तात्काळ लोककल्प फौंडेशनला संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी
केले.
यावेळी किरण बडवाण्णाचे, गजानन बाडीवाले, अंकुश जंगले, अनंत जंगले, संजय जंगले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित
होते.