नवी दिल्ली
लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक यादीत भारताचे स्थान 10 अंकांनी घसरले आहे. द इकॉनॉमिक इंटेलिजेन्स युनिटने (ईआययू) 2019 साठी प्रसिद्ध केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारताला 51 वे स्थान प्राप्त झाले आहे. संस्थेने भारताला त्रुटीपूर्ण लोकशाही ठरवत नागरिकांच्या स्वातंत्र्यात घसरण झाल्याचा दावा केला आहे. भारताला 2018 मध्ये 7.23 गुण प्राप्त झाले होते. 2019 मध्ये हा आकडा 6.90 वर आला आहे.
ही जागतिक यादी 165 स्वतंत्र देश आणि लोकशाहीच्या सद्यस्थितीचा आराखडा सादर करते. निवडणूक प्रक्रिया, बहुलतावाद, सरकारचे कामकाज, राजकीय भागीदारी, राजकीय संस्कृती आणि नागरी स्वातंत्र्य या 5 मापदंडांवर हा निर्देशांक तयार केला जातो. एकूण गुणांच्या आधारावर देशांचे 4 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.
चीन यादीत तळाला
चीन 2019 मध्ये 2.26 गुणांसह आता 153 व्या स्थानावर आहे. जागतिक मानांकनात हे स्थान तळाचे मानले जाते. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये ब्राझील 6.86 गुणांसह 52 व्या स्थानावर आहे. तर रशिया 3.11 गुणांसह यादीत 134 व्या स्थानावर आहे. पाकिस्तान एकूण 4.25 गुणांच्या मदतीने यादीत 108 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंका 6.27 अंकांसह 69 व्या आणि बांगलादेश 5.88 अंकांच्या मदतीने 80 व्या स्थानी आहे. नॉर्वे यादीत अग्रस्थानी तर उत्तर कोरियाला अखेरचे 167 वे स्थान प्राप्त झाले आहे.