साहित्यिक-डॉ.बसवराज जगजंपी : देवर दासिमय्या जयंती साजरी
प्रतिनिधी /बेळगाव
सार्थक जीवनाचे सार वचन साहित्यात दडलेले आहे. जीवनाचा प्रत्येक टप्पा हा शरण वचन साहित्यात स्पष्ट केला आहे. तेव्हा प्रत्येकाने त्याचा आदर्श घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्ये÷ साहित्यिक व निवृत्त प्रा. डॉ. बसवराज जगजंपी यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथील चावडी गल्लीत मल्लिकार्जुन देवस्थानच्या आवारात वचनकार देवर दासिमय्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
कन्नड व संस्कृतिक विभागाच्या सहसंचालिका विद्यावती बजंत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महानगरपालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी आभार मानले. सत्यनारायण भट्ट यांनी सामूहिक संगीताचा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाआधी खासबाग येथील बसवेश्वर चौक येथून देवर दासीमय्या यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. चावडी गल्ली-वडगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या आवारात या मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, दिपाली टोपगी, रेश्मा कामकर, प्रिती कामकर, व्यंकटेश वनहळ्ळी, परशुराम ढगे, नारायण गुलगोड, अशोक हणबरट्टी, गुरुसिद्धप्पा तिगडी, मारुती बंगोडी, बसवराज जडफण्णावर आदी उपस्थित होते.