टोलवसुली होणार जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे : टोलनाके होणार हद्दपार, प्रवासही गतिमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्मयांसंदर्भात महत्त्वाची घोषणा गुरुवारी केली. येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांना वारंवार थांबण्याची गरज भासणार नाही. येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त होतील असे गडकरी म्हणाले. एक नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा आणण्यात येणार असून टोलची रक्कम थेट वाहनधारकाच्या बँक खात्यातून वसूल केली जाणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात आहे.
रशियन सरकारच्या मदतीने भारत सरकारने जीपीएस आधारित प्रणाली आणली आहे. ही यंत्रणा येत्या एक-दोन वर्षात सुरू झाल्यास भारत टोलनाकामुक्त होईल. यामुळे टोलनाक्मयावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच टोलनाक्मयांच्या देखभालीवर होणारा सरकारचा खर्च कमी होणार आहे. नव्या जीपीएस यंत्रणेमुळे महामार्गावरून धावणाऱया वाहनांची संख्या, ये-जा असा प्रवास देखील कळू शकणार आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे राष्ट्रीय महामार्ग टोलची वसूली 5 वर्षात 1 लाख 34 हजार कोटींनी वाढू शकते. तसेच व्यवहारातही पारदर्शकता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाके लवकरच हद्दपार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारची माहिती दिली होती. मात्र, आता लोकसभेमध्ये त्यांनी ही माहिती दिल्याने या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील’, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसप खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरी यांनी उत्तर दिले.
93 टक्के चारचाकी वाहनांवर फास्टॅग
मागील महिन्यापासून टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात आली होती. फास्टॅगच्या अंमलबजावणीला वाहनधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत जवळपास 93 टक्के चारचाकी वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर्स लावून त्याद्वारे टोलवसुली होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांनी यावेळी फास्टॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱया वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश आपण दिला असल्याची माहितीही दिली. वाहनांना फास्टॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरीचा गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले.