पावसाचे संकट कायम, वादळी वाऱयाच्या पावसामुळे उन्मळून पडली झाडे, विद्युतखांबही कोसळले : शेतकरी संकटात, कांही पिकांना पाऊस पोषक
वार्ताहर /किणये
वादळी वाऱयासह शुक्रवारी पुन्हा एकदा वळीव पावसाने तालुक्मयातील पश्चिम भागाला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी या पावसामुळे झाडे उन्मळून व विद्युत खांब कोसळून पडले. तर काही जणांच्या घरांवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकारही घडले. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या वळिवाच्या पावसाने शेतकऱयांसह साऱयांचीच झोप उडविली आहे. हा वळीव पाऊस थांबणार तरी कधी? अशी चर्चा तालुक्मयात सुरू आहे.
पंधरा दिवसांपासून अधूनमधून वळीव पाऊस होऊ लागला आहे. उष्म्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे नागरिकांना लाही लाही करावी लागत आहे आणि अशातच वळिवाचा मुसळधार पाऊस पडत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. गेले दोन-तीन दिवस पुन्हा वळीव पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. साधारणतः दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. तालुक्मयाच्या पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे.
बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बोकनूर, बेनकनहळ्ळी, मण्णूर, आंबेवाडी, जानेवाडी, बिजगर्णी, नावगे, किणये, कर्ले, संतिबस्तवाड, वाघवडे, झाडशहापूर, मच्छे, पिरनवाडी, देसूर या भागात शुक्रवारी अधिक पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी गटारींचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.
वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे काही गावांमध्ये व शेतशिवारात विद्युतखांब कोसळून पडले. विद्युतखांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामनाही करावा लागला. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार घडले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
वळिवाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील वाटाणा, हरभरा, मसूर या पिकांचे नुकसान याआधीच झालेले आहे. सध्या शेतशिवारात ज्वारीच्या कणसाची काढणी सुरू आहे. कणसे बऱयापैकी बहरून आलेल्या कालावधीतच वळिवाचा पाऊस होऊ लागला आहे. यामुळे बहरून आलेली जोंधळय़ाची कणसे खराब झाली असल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वळिवाच्या पावसामुळे कोथिंबिर, मेथी, गाजर, मिरची व इतर भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ही पिके नाजूक असतात. मुसळधार पाऊस आला की त्या पिकांचे नुकसान हे ठरलेलेच असते. यामुळे यंदा उन्हाळय़ात या पिकांसाठी खर्च केलेल्या शेतकऱयांवर मात्र कर्जाचा डोंगर उभा ठाकणार आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बाची, राकसकोप या भागात उन्हाळी बटाटय़ांची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. या बटाटय़ांची सध्या काढणी सुरू आहे. पावसामुळे बटाटा काढणीची कामे खोळंबली आहेत. तसेच हवामानातील बदल, अधूनमधून येणारा वळिवाचा पाऊस यामुळे यंदा निम्म्याहून अधिक बटाटा उत्पादनात घट झाली असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली आहे.
देसूर भागात विटांचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यंदा मात्र वीट व्यावसायिकांची वळिवाच्या पावसाने झोपच उडविली आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून वळिवाचा पाऊस होत असल्याने बनविलेल्या कच्च्या विटा पावसामुळे पूर्णपणे खराब झाल्या आहेत. याचा फटका वीट व्यावसायिकांना बसला आहे.
सध्या यात्रा व लग्नसराईचा हंगाम जोरात आहे. ऐन कार्यक्रमाच्या वेळातच पाऊस होत असल्याने नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. यंदा वारंवार होणाऱया वळिवाच्या पावसामुळे शेतकऱयांसह सारेच जण वैतागून गेलेले आहेत. वळिवाचा पाऊस आता थांबला पाहिजे, अशी साऱयांचीच इच्छा असून वरुणराजाने विश्रांती घ्यावी, अशी आस साऱयांनाच लागून राहिली आहे.
उचगाव परिसराला पावसाचा तडाखा
उचगाव परिसराला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला अवकाळी, वळीव पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सर्वत्र जोरदार सोसाटय़ाचा वारा आणि पावसाचा मारा यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱयामुळे रब्बी हंगामात लावण्यात आलेल्या बटाटा पीक काढणीमध्ये खोळंबा निर्माण झाला तर ऊस, मका व इतर भाजीपाला, मिरची या सर्व पिकांना पाऊस वरदान ठरला आहे. चालु वर्षाच्या हंगामामध्ये जोरदार पावसाचा तडाखा पहिल्यांदाच उचगाव परिसरात झाल्याचे चित्र दिसून येत होते. गोजगा, मण्णूर, उचगाव, अतिवाड, बेकिनकेरे, कल्लेहोळ, सुळगा, तुरमुरी, बाची, कोनेवाडी भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. जोरदार वाऱयाच्या तडाख्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे चित्र व काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचेही दिसून येत होते. अनेक घरांच्या आजुबाजूला असलेल्या शेडवरील पत्रेही वाऱयाच्या जोरदार तडाख्याने उडाल्याचे चित्र दिसून येत होते. बटाटे काढणीला विलंब झाला आहे तर इतर सर्व पिकांना हा पाऊस वरदान ठरला आहे. याबरोबरच शेतीची मशागत करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला असून पश्चिम भागातील आंबा, काजू बागायतदार यांचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱयाच्या तडाख्याने आंब्याच्या काजुच्या झाडावरून लहान लहान धरलेली फळे वाऱयाच्या तडाख्याने खाली गळून पडल्याचे चित्र दिसून येत होते. याचा मोठा तडाखा बागायतदारांना बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे.