पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : बळिराजा झाला हतबल : बुधवारीही पावसाची जोरदार हजेरी
वार्ताहर /किणये
गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्मयात अधूनमधून वळीव पाऊस पडत आहे. बुधवारीही वळीव पावसाने तालुक्मयाला चांगलेच झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून बळिराजा हतबल झाला आहे. बुधवारी पुन्हा झालेल्या वळिवामुळे सध्या तरी पावसाचे संकट कायम असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सोमवारपासून सुरू असलेला पाऊस अद्याप विश्रांती घेत नाही. यामुळे शेतकऱयांची झोप उडाली आहे. शेतशिवारातील ज्वारी, हरभरा, वाटाणा, मसूर या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शिवारांमध्ये जोंधळय़ाला कणसे बहरून आली आहेत. या कणसांची तोडणी करण्याच्या कालावधीतच पाऊस पडत असल्याने जोंधळय़ाची कणसे पूर्णपणे खराब झाली आहेत. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
भाजीपाला पिकावर मोठा परिणाम
रब्बी हंगामातील कडधान्य मळणीची कामे सुरू असतानाच पाऊस पडत असल्यामुळे कडधान्य पिकेही खराब झाली आहेत. वातावरणामध्ये उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अधूनमधून पाऊस पडत आहे. याचा भाजीपाला पिकावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
वळिवाच्या पावसामुळे कोथिंबीर, लालभाजी, गाजर, मेथी ही पिके खराब झाली आहेत. मच्छे, पिरनवाडी, नंदिहळ्ळी भागात काकडी व कलिंगडांची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. वेलींना काकडी व कलिंगडांची फळधारणा झाली आहे. मात्र, हवामानातील बदल व सततच्या वळीव पावसामुळे ती खराब होत आहेत. यामुळे यासाठी केलेला खर्च आता कसा निघणार? याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे.
पावसाने विश्रांती घेण्याची अपेक्षा
ऐन कडक उन्हाळय़ाच्या दिवसात वळिवाचा पाऊस होत असल्याने ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. काही गावांतील गटारींमध्ये केरकचरा अडकला आहे. त्यामुळे पाण्याचा गटारीतून योग्य प्रकारे निचरा होत नाही. परिणामी गटारीचे पाणी थेट रस्त्यांवरून वाहत आहे. वळिवाच्या पावसामुळे सारेजण हैराण झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात यात्रा, साखरपुडा तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. पावसाने आता विश्रांती घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱयांसह नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शेतकरी शिवारातील सुका चारा आणून त्याची साठवणूक करीत आहेत. पण पावसामुळे हा चारा भिजू लागला आहे. यामुळे यंदा सुक्मया चाऱयाचा प्रश्न गंभीर बनणार असल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिली. पश्चिम भागासह येळ्ळूर परिसरात व सर्रास भागात बुधवारी पाऊस झाला. या पावसामुळे वीट व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.