दोन दिवसात 36 जण बाधित
प्रतिनिधी/ सातारा
वाई शहरातल्या व्यापाऱयांनी बाजारपेठ सुरु करण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु प्रशासनाने वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहून वाई बंदच ठेवणे पसंद केले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी शनिवारी सायंकाळी उशीरा बैठक घेतली.त्या बैठकीचा वृत्तांत समजू शकला नाही. दरम्यान, वाई शहरातील 35वर्षीय महिला कोरोनामुळे रात्री मृत्यू झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही दहशत कायम आहे.
वाई शहर शांत आणि संयमी शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मार्च महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापारी वर्ग अडचणीत आहेत. त्यात शहरातील काही व्यापाऱयांनाही कोरोना झाला असला तरीही दुकाने सुरु करण्याची मागणी केली जात आहे. सध्या वाई पालिकेत कोरोनाचा शिरकाव असल्याने 12 जण बाधित असल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. त्यामुळे कंटेटमेंट झोनबाबत निर्णय घेता येत नाहीत. वाईच्या व्यापाऱयांनी केलेल्या मागणीची विनंती आमदार मकरंद पाटील यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी म्हणून प्रांत संगीता राजापुरकर-चौगुले, वाइं&चे तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार होता. परंतु आमदार मकरंद पाटील हे मुंबईला कामानिमित्ताने गेले होते. ते सायंकाळी उशीरा आल्यानंतर वाईत बैठक घेतल्याचे समजते.
वाई शहरात रात्री एक 35 वर्षीय महिला कोरोनामुळे बाधित होवून मृत झाली आहे. ही महिला तब्येतीने अतिशय नाजूक होती. तिला दम्याचा त्रास होत होता. दरम्यान रात्रीच्या अहवालात वाई तालुक्यातील वाई येथील 53,37,34,48 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, 45,18,26,70,30,36,46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालीका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनी येथील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32,35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष, बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59,39,35, वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक बाधित झाले आहेत.