वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर येथे बंगला घेणेसाठी पाच लाख रुपये हुंडा म्हणून माहेरहून आणावेत, मुलगी का जन्माला आली यासह तिहेरी तोंडी तलाख देवून जीवे मारण्याची धमकी व सतत शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याच्या कारणास्तव वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील विवाहितेने पती, सासु, दीर या तिघाविरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.महिला फिर्यादी रूक्साना महमंद खतिब ही वाडी रत्नागिरी येथे माहेरी रहात आहे सन २०१३ ला लग्न झालेपासून एक मुलगी देखील झाली आहे. फिर्यादीस पती महमंद हा दोन महिन्यापूर्वी माहेरी सोडून कोल्हापूरच्या घरी गेला आहे.पती महमंद सज्जाउद्दीन खतीब दीर ईस्माइल, सासू हवाबी हे कोल्हापूर येथे बाबूजमाल दर्गा जवळ रहातात यातील पती याने बंगला घेण्यास पाच लाख रुपये आणावेत तसेच मुस्लीम धर्मात तोंडी तलाख द्वारे घटस्पोट देण्यास बंदी असून देखील वारवांर तोडी तलाख, शिवीगाळ, मारहाण केली जाते मुलगीच का झाली म्हणून देखील त्रास दिला जातो या कारणास्तव फिर्याद नोंदवली आहे पोलीस नाईक राजीव सानप तपास करीत आहेत.