केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सरकारला आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे राज्य सरकारने प्राधान्यक्रमाने मूल्यांकन करावे आणि लवकरात लवकर मदतीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. त्याचा पाठपुरावा करून आपत्तीग्रस्तांना शक्मयतो लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली दिली आहे.
कोविड महामारीमुळे आधिच हवालदील झालेल्या गोव्याच्या जनतेचे चक्रीवादळाने कंबरडेच मोडले आहे. ‘तौक्ते‘ वादळाने गोव्याची प्रचंड प्रमाणात हानी केली आहे. नेसर्गिक आपत्ती कोसळलेल्यांना शक्मयतो लवकर मदत मिळणे गरजेचे आहे.
कोविडने त्रस्तलेल्यांचे छत्रही हिरावून नेले
चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण गोव्याला बसलेला असला तरी प्रामुख्याने उत्तर गोव्यातील बागायतदार आणि शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झालेली आहे. आधीच कोविडमुळे लोकांचे कामधंदे बंद झालेले आहेत. लोकांचे उत्पन्नाचे साधन जवळपास बंद झालेले असताना, चक्रीवादळाने त्यांचे छत्रही हिरावून नेले आहे. अशा परिस्थितीत आपत्तीग्रस्तांना वेळेत मदत मिळणे अत्यावश्यक बनले आहे, असे नाईक यांनी नमूद केले आहे.
मतभेद विसरुन संकटांवर मात करुया
कोविड महामारीचा सामना करायचा की कोसळलेल्या वादळरुपी नैसर्गिक आपत्तीतून कसे सावरायचे, या द्विधा मनःस्थितीत गोव्याची जनता सध्या सापडली आहे. लोकांना या स्थितीत धीर देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापसतले मतभेद विसरून आलेल्या संकटांवर एकत्रीतपणे मात करण्याची गरज आहे, असेही नाईक यांनी नमूद केले.
गेल्या दशकातील सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाणाऱया या चक्रीवादळाने मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले. अनेक विजेचे खांब तुटले आहेत. विजेच्या धक्क्याने माणसांसह गुरा-वासरांचेही बळी गेले. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी सरकारची आपत्कालीन यंत्रणा रात्रीचा दिवस करत आहेत, तथापि नुकसानीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. असे असले तरी आपत्तीग्रस्तांचे प्राधान्य क्रमाने पुनर्वसन होण्याची आवश्यकता नाईक यांनी व्यक्त केली आहे.