डिचोली/प्रतिनिधी
खालचावाडा येथील मधुकर केशव बायकर यांच्या घरावरचे पत्र्याचे छप्पर उडून पत्रे विविध ठिकाणी पडल्यानंतर घरात पाणी साचले. घरातील किंवा शेजारी कोणी बाहेर नसल्याने कोणाला इजा झाली नाही. पण हे छप्पर उडाल्याने अंदाजे पन्नास हजार रूपयांपेक्षा आर्थिक नुकसान झाले आहे.
मधलावाडा येथील संदीप वसंत नाईक साळगावकर यांच्या घरावर सागवान चे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने छप्पराची मोडतोड होऊन मंगळूरी कौले फुटल्याने घरात पाणी साचले. पुढील कारवाईसाठी अग्नी शमन दल – डिचोली यांना कळविले आहे असे पंचायत सहसचिव शांबा घुरे यांनी सांगितले.
रात्रीपासून जोरदार वाहणाऱया वाऱयामुळे केळी बागायतीचा अंदाज घेण्यासाठी केळीबागायतदार गुरूदास देसाई हे मळा क्षेत्रात सकाळी गेले असता त्यांच्या डोळय़ासमोर टेकू सहीत केळी मोडून, उन्मळून पडत होत्या. त्यात मंगेश परवार , गुरूदास देसाई व अन्य केळीबागायतदारांचे नुकसान झाले आहे. पण नेमके किती आर्थिक नुकसान झाले हे स्पष्ट झाले नाही. विज खात्याचे कर्मचारी विज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.