लॉकडाऊनचा वाहन क्षेत्रावर परिणाम : संसदीय समितीच्या अहवालात माहिती
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे आणि या संकटाला आळा घालण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या प्रभावाने विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. यातून वाहन क्षेत्रही सुटलेले नाही. वाहन क्षेत्राला दररोज 2300 कोटी रुपयांचा तोटा झाला असून या क्षेत्रातील 3.45 लाख कोटी लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे, अशी माहिती संसदीय समितीच्या एका अहवालातून देण्यात आली आहे. सदरचा अहवाल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
तेलंगाणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) संसदीय सदस्य केशव राव यांच्या अध्यक्षतेखाली संसदेची स्थायी समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये वाहन क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी विविध सल्ले या समितीकडून देण्यात आले आहेत. याच अहवालात सध्याच्या शेतीविषयक कायद्याच्या धोरणाचाही समावेश आहे.
वाहन उद्योगातील विविध संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार व त्यांच्या अंदाजानुसार प्रमुख ओरिजनल इक्विपमेंट निर्मिती (ओइएम) कंपन्यांनी मागणी आणि विक्री घटल्याच्या कारणामुळे उत्पादनात 18 ते 20 टक्क्यांची कपात केली आहे.