परिवहनचे दुर्लक्ष : बसफेऱया कमी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : अपुऱया बसेसमुळे बसथांब्यांवर उसळते गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात अपुऱया बससेवेचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसत असून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. एकीकडे गर्दीचे कारण पुढे करून सण, उत्सवांवर प्रशासनाने मर्यादा आणल्या आहेत. दुसरीकडे शासनाच्या परिवहन विभागाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची बेधडक वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता कोरोनाबरोबर जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने शहराबरोबर ग्रामीण भागातील बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने सीमा हद्दीवर कोरोना तपासणी चेक पोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. दुसरीकडे मात्र बसमधून प्रवाशांची हाऊसफुल्ल गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बसमध्ये होणाऱया गर्दीविषयी चिंता व्यक्त होत आहे. शहर व ग्रामीण भागात धावणाऱया बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे. कोरोनामुळे जादा बसफेऱया कमी झाल्याने प्रवाशांना तासन्तास बसथांब्यांवर ताटकळावे लागत आहे. प्रशासनाने आता सहावी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तुलनेत बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनासारख्या परिस्थितीतही गर्दीने प्रवास करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांचा बसमधून लोंबकळत प्रवास सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल घेऊन परिवहनने जादा बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. शहरातील चन्नम्मा चौक, आरपीडी क्रॉस, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अपुऱया बससेवेमुळे शेकडो विद्यार्थी बसथांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. सकाळी, दुपारी व सायंकाळच्या वेळेत ही गर्दी अधिकच असते. त्यामुळे विद्यार्थी घरी पोहोचण्यासाठी मिळेल त्या बसने धोकादायक प्रवास करत आहेत. याबाबत कित्येक वेळा परिवहन मंडळाकडे तक्रारी करूनही अधिकाऱयांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून बसफेऱया वाढवून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.