एस. एस. बसवनाळ जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्ने पेरावीत. त्यांच्या मनात सकारात्मकता भिनवून त्यांना उत्तेजीत केले तरच त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तमरीत्या घडू शकते, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
शनिवारी येथील जीए पदवीपूर्व महाविद्यालयात झालेल्या शिक्षणतज्ञ प्रा. एस. एस. बसवनाळ यांच्या 127 व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रा. आर. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. बी. एस. गवीमठ उपस्थित होते. यावेळी रत्नप्रभा बेल्लद, एस. एस. पुराणिकमठ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी 74 व्या वर्षात पदार्पण केलेल्या प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या वाढदिवसानिमित्त व जीए हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या जडणघडणीत पालकांप्रमाणेच शिक्षकांचे पात्रही मोठे आहे. सप्तर्षींच्या त्यागामुळे केएलई संस्थेची स्थापना झाली. ही संस्था आता वटवृक्ष झाली आहे. वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात देश आणि जागतिक पातळीवर संस्थेने आपला ठसा उमटविला आहे. आपणही याच संस्थेत शिक्षण घेतले त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
प्रा. बी. एस. गवीमठ म्हणाले, एस. एस. बसवनाळ हे त्यागमूर्ती होते. जीए हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रात त्यांची कामगिरी मोठी आहे. जे काम 100 जणांना शक्मय नाही त्या एकटय़ांनी करून दाखविले आहे. शिक्षक, कवी, लेखकाला कधी मरण नाही. आपल्या कर्तृत्वाने ते जनमाणसांत जिवंत असतात. म्हणून 127 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले जात आहे. श्रीमती ए. आर. पाटील यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. एम. एस. बळीगार यांनी स्वागत केले. एस. एस. पुराणिकमठ यांनी आभार मानले.
जुन्या आठवणींना उजाळा
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे येथील जीए हायस्कूल व आरएलएस कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कार्यक्रमानिमित्त ते शनिवारी हायस्कूलमध्ये आले. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपण शिकत असलेले क्लास, मैदान कसे होते याच्या आठवणी सांगतानाच शिक्षकांचेही त्यांनी गुणगाण केले. याच शाळेतील अनेक शिक्षकांनी आपल्याला घडविले. पूर्वी लिंगराज कॉलेजचे मैदान लाल मातीचे होते. या मैदानावर फुटबॉल खेळायला आवडायचे. आता खूप सुधारणा झाली आहे, असे सांगत जिल्हाधिकाऱयांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.