1998 पुर्वीच्या नोंदणी ग्राह्यधरुन अन्य बांधकामे पाडण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथेचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला किल्ले विशाळगड सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. शासनाने 1998 पुर्वीच्या नोंदणी ग्राह्यधरुन अन्य बांधकामे पाडण्याची मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विराधी कृती समितीने केली आहे. महिनाभरात हि अतिक्रमणे पाडली नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिला.
घनवट म्हणाले, किल्ले विशाळगडवरील मंदिरे, समाधी यांची दूरावस्था झाली आहे. पूरातत्व विभागाचे याकडे साफ दूर्लक्ष झाले आहे. तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे किल्ल्याच्या खरा इतिहास झोकाळला जात आहे. त्यामुळे किल्ल्यावरील संपूर्ण ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे फलक उभारण्यात यावेत. 1998 पुर्वी ज्या नोंदी शासनाकडे आहेत त्Îा ग्राहÎधरुन उर्वरीत सर्व बांधकामे त्वरीत हटविण्यात यावेत. अतिक्रमणे हटेपर्यंत पुरतत्व विभागाच्या अधिकाऱयांनी प्रत्येक महिन्याला विशाळगडला भेट द्यावी. तसेच गडाचे पावित्र्य राखण्यासाठी गडावरील मद्यपान, मांसविक्री थांबवण्यात यावी, शासनाने यासर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घनवट यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला समितीचे समन्वयक किरण दुसे उपस्थित होते.
19 रोजी छत्रपती शिवाजी चौकात घंटानाद
किल्ले विशाळगडवरील वाढत्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समितीतर्फे शुक्रवार 19 रोजी छत्रपती शिवाजी चौकात घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहितीही घनवट यांनी दिली.