वीज वितरणच्या गलथान कारभारावर नाराजी
वेंगुर्ले/प्रतिनिधी –
वेतोरे-गोसावीमठ येथील गिरीधर वसंत कोळकर यांच्या काजू बागेस 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसक्रिटमुळे आग लागून 415 फळानी डवरलेली काजू कलमांची हानी झाली. यात कोळकर याचे सुमारे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थ व कुडाळच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्यात आलीr. वेतोऱयातील शेतकरी गिरीधर कोळकर यांच्या काजू बागेतुन 33 केव्हीची विद्युत लाईन गेली आहे. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास शॉर्टसक्रिमुळे या काजू बागेस आग लागली. सदरची आग तेथील यश नाईक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संदर्भात शुभांगी कोळकर यांना कल्पना दिली. आग लागल्याचे समजताच कोळकर व त्यांच्या बागेलगतचे आंबा काजू बागायतदार माधव, धुरी, ठाकुर यांनी आपल्या कामगारांसह घटनास्थळी धाव धेतली. ग्रामस्थांनी कॉमप्रेसरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच कुडाळ येथील अग्निशमन बंबहि बोलाविण्यात आला. मात्र, दुपारची वेळ असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत कोळकर यांची 500 पैकी 415 फळांनी डवरलेली काजू कलमे आगीत होरपळून नुकसान झाले.