जिल्हा उपनिबंधकांना काळे फासणार, बळीराजा शेतकरी संघटनेचा ईशारा
वार्ताहर /कराड
काही दिवसांपर्यंत सोयाबिनला 9 ते 10 हजार रूपयांचा दर मिळत होता. यामुळे शेतकऱयांना दोन पैसे मिळण्याची अशा असतानाच व्यपाऱयांनी संगनमत करूण सोयाबिनचे दर पाडले असुन शेतकऱयांनी कष्टाने पिकवलेल्या सोयाबिनवर व्यपारी दरोडा टाकण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बाजारसमित्या व आपल्या कार्यालयांना योग्य त्या सुचना द्याव्या अन्यथा जिल्हा उपनिबंधकांना काळे फासण्याचा ईशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत तहसिलदार विजय पवार व उपनिबंधक जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सुनील कोळी, आकाश रेठरेकर, सागर कांबळे व शेतकरी उपस्थित होते.
साजीद मुल्ला म्हणाले की, खाद्य तेलाचे दर वाढल्याने सोयाबिनच्या दरातही चांगली वाढ झाली होती. अतिवृष्टी, महापुर व लॉकडाऊनमुळे आडचणीत आलेल्या शेतकऱयाला किमान सोयाबिनचे दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा असतानाच व्यपाऱयांनी संगनमत करून सोयाबिनचे दर पाढले आहेत. आठवडाभारापासुन सोयाबिनची काढणी सुरू झाली आहे. शेतकऱयाला पैशाची गरज असल्याने व सायाबिन साठवायला जागा नसल्याने शेतकरी सोयाबिन काढल्यानंतर लगेच विकायला घेऊन जातो. याचाच फायदा घेत व्यपाऱयांनी सोयाबिनचे दर चार ते पाच हजार रूपयांवर आणले आहेत.
यावर शेती उत्पन्न बाजार समिती व शेतकऱयांचे कैवारी म्हणून बसलेले संचालक काही बोलायला तयार नाहीत. सोयाबीनची गुणवत्ता तपासण्यासाठी व्यापारी मशिनचा वापर करतात. मुळात या मशिन ला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही त्यातूनच व्यापारी शेतकऱयांनी घामाने पिकविलेल्या सोयाबीन ची गुणवत्ता तपासणी च्या आडून सोयाबिनवर दरोडा टाकत आहेत. सोयाबीन मळणी केल्यानंतर विक्री ला आणल्यानंतर पाच किलो ची तुट शेतकरी ग्रुहीत धरतो. परंतु व्यापारी वीस ते पंचवीस किलो ची घट दाखवून शेतकऱयांची अडवणूक करत आहेत.
याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी जिह्यातील आपल्या कार्यालयांना योग्य ते आदेश देऊन कारवाई करण्यास भाग पाडावे. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपनिबंधक सातारा यांना काळे फासणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.