प्रतिनिधी/ बेळगाव
भगवान महावीर जयंती निमित्त 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कत्तलखाने तसेच मांस विक्री बंद करावी, अशी मागणी भगवान महावीर जन्म कल्याण मध्यवर्ती उत्सव समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
भगवान महावीर यांनी हिंसा करु नये, असे प्रबोधन केले होते. याचबरोबर प्राणी हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंद घातले हे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे. किमान हे दहा दिवस तरी सर्व कत्तलखाने आणि मासांहार विक्री बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, श्रीपाल खेमलापुरे, विनोद दोड्डण्णावर, राजू कोडा, प्रमोद बोरण्णावर, पोरवाल यांच्यासह जैन समजातील नागरिक उपस्थित होते.