प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. उन्हाचा तडाखाही वाढला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनासाठी लॉकडाऊन केल्यामुळे पोलिसांना भर उन्हातच रस्त्यावर थांबावे लागत होते. ऊन आणि उष्मा यामुळे पोलीस हैराण झाले होते. दुपारी पाऊस आल्यामुळे थोडासा गारवा निर्माण झाला. त्यामुळे काहीसा दिलासा पोलिसांना मिळाला. बाजारपेठमध्ये शुकशुकाट पसरल्यामुळे कोणालाच या पावसाचा व्यत्यय आला नाही. सध्या शेतकरी शिवारातील कामे करण्यात व्यग्र आहे. कडधान्य काढणी पूर्ण झाली आहे. काही शेतकऱयांचा जोंधळा शिवारामध्ये आहे. मात्र, काही शेतकऱयांना कामकाजासाठी पावसाची गरज होती. त्यामुळे हा पाऊस शेतकऱयांसाठी फायद्याचा ठरला.
येळ्ळूर, सुळगे (ये.), वडगाव, शहापूर, मजगाव, अनगोळ, मच्छे, पिरनवाडी, देसूर या परिसरात पाऊस बऱयापैकी झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आता कामकाज करणे सोपे जाणार आहे. मात्र, अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.