प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहापूर, खडेबाजार रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. मात्र, येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करून उर्वरित कामे पूर्ण करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. परिणामी साईडपट्टय़ांसह विविध कामे शिल्लक आहेत. काही गर्दीच्या ठिकाणी खड्डे आणि मातीचे ढिगारे असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे वेळेवर पूर्ण करण्यास स्मार्ट सिटी कंपनीला अपयश आले आहे. याबाबत तक्रारी करूनही काँट्रक्टरांसह अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. परिणामी सदर रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर मातीचे ढिगारे, काही ठिकाणी रस्त्याशेजारी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. याचा फटका व्यावसायिक आणि नागरिकांना बसत आहे. येथील काँक्रिटीकरणाचे काम करण्यापूर्वी गटारीच्या पाईप घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने हा रस्ता बंद होता. त्यानंतर काँक्रिटीकरणासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी एक महिना बंद ठेवण्यात आला होता. तरीदेखील अद्याप येथील कामे अपूर्णच आहेत. ठिकठिकाणी गटारीचे बांधकाम अर्धवट असून चेंबरवरील झाकणे बसविण्यात आली नाहीत. चेंबर बनविण्यासाठी उघडय़ावर ठेवण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा रहिवासी, व्यावसायिक आणि ग्राहकांना धोकादायक बनल्या आहेत.
साईडपट्टय़ांचे काम झाले नसल्याने रस्त्यावर अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता महत्त्वाचा असल्याने खरेदीसाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. दक्षिण भागातील विविध गावांना व उपनगरांना ये-जा करणाऱयांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अशातच साईडपट्टय़ा नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क करण्यात येतात. परिणामी शहापूर खडेबाजार रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील अर्धवट कामांची डोकेदुखी वाढली असून ही कामे कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे. काही ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे व व्यावसायिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. अळवण गल्ली कॉर्नर येथील रस्त्यावर रॅम्प नसल्याने माती घालण्यात आली आहे. प्रत्येक रस्त्याच्या कॉर्नरवर रॅम्प घालण्याची गरज आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे..