महापालिका आयुक्तांना नागरिकांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शास्त्रीनगर येथील सहावा क्रॉस ते दहावा क्रॉसपर्यंत गटारी गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तातडीने या गटारी साफ कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
गटारी स्वच्छ केल्या नसल्यामुळे कचरा साचून आहे. परिणामी पाणी निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळय़ात गटारींमधून पाणी निचरा होत नसल्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये शिरत आहे. तेव्हा तातडीने या परिसरातील गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश दड्डीकर, स्वीकार रेवणकर, प्रकाश सोनी व नागरिक उपस्थित होते.