कसबा बीड / प्रतिनिधी
शिरोली दुमाला तालुका करवीर येथील कृष्णात गणपती कांबळे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी शेतकरी श्री रणजीत बाळासो पाटील हे आपल्या शेतामध्ये विहिरीची मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. त्यांना विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असलेला दिसला,तेव्हा त्यांनी आपल्या मोबाईलवरून पोलिसांशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ पोलीस प्रशासनाने दखल घेऊन घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल विजय गुरव व नायक संग्राम पाटील यांनी पाहणी करून मृतदेह बाहेर काढला.बाहेर काढलेला मृतदेह कृष्णात गणपती कांबळे वय 30 जुनी गल्ली शिरोली दुमाला या गावचे असल्याची खात्री होताच नातेवाईकांना बोलावून माहिती दिली. कृष्णात हा व्यसनाधीन असल्यामुळे चार ते पाच दिवस घराबाहेर असायचे, व नंतर घरी यायचे. गेली चार दिवस मयत कृष्णात कांबळे हे बेपत्ता होते.विहिरीत कृष्णात त्यांचा मृतदेह आढळल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.पुढील तपासासाठी व शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात नेण्यात आला.शवविच्छेदननंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.कृष्णात यांच्या पश्चात पत्नी, 3 बहिणी आणि आई असा परिवार आहे.पुढील करवीर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री विजय गुरव करत आहेत.