ऑनलाईन टीम / मुंबई :
26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. दहा रुपयांच्या या थाळीसाठी फोटो व आधर कार्ड दाखवावे लागेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. ती अफवा आहे.
भुजबळ म्हणाले, शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार आहोत. तसेच शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱयास प्रथम प्राधन्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटले.
या योजनेतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिह्याचे मुख्यालय व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.