मराठा आरक्षणाबाबत सरकार भांबावून गेलं आहे
प्रतिनिधी / सातारा
सध्या शिवसेनेची फरफट सुरू आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांची असलेली जागा गेली आहे. भाजपला आपले यश मिळवता आले आहे. अशी टिप्पणी करत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकार भांबावून गेले आहे. आता आम्हाला सरकारच्या भूमिकेवर संशय येतो, अशी शंका व्यक्त करत त्यांनी शेतकरी आंदोलन बोलवता धनी वेगळा आहे, असे सांगितले. दरम्यान, भाजपचे कोणीही आमदार सोडून जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
चिंचणेर निंब येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे आता कसे झाले आहे ?,नुसती फरफट सुरू आहे. विधान परिषदेचे होती ती जागा गेली आहे. भाजपने यश मिळवले आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कोरोनाला लसीबाबत छेडले असता ते म्हणाले, जातीपाती धर्माच्यापलीकडे पाहिजे.पक्ष, प्राणी पाहू नये, आपत्ती असल्याने लस घेतली पाहिजे, असे सांगितले. शिवसमर्थ शिल्पाबाबत ते म्हणाले, चांगल्या कामाला विरोध होऊ नये असे मत मांडले. भाजप आमदार पक्ष सोडणार असल्याबाबत सोडणार असल्याच्या मुद्यावर छेडले असता ते म्हणाले, ही चर्चा आळवावरच्या पाण्यासारखी आहे. भाजप हा पक्ष भविष्य असलेला पक्ष आहे. जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी यश मिळवत असताना कोण सोडून जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत सरकार भांबावून गेले
मराठा आरक्षण प्रश्नी ते म्हणाले, मराठा आरक्षण सरकारने द्यायला हवे होते. कोर्टाची बाजू समजून घ्यायला हवी होती. तसे न करता सरकार पुरते भांबावून गेले आहे. तसेच शेतकरी आंदोलनबाबत ते म्हणाले, या आंदोलनाच्या मागचा बोलवता धनी वेगळा आहे, असे सांगितले.