—
T
वार्ताहर/जमखंडी :
यंदाच्या हंगामापासून शेतकऱयांना आपल्या पिकाचा सर्व्हे मोबाईल ऍपद्वारे करावा लागणार आहे. याची मुदत 24 ऑगस्टपर्यंत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. जिल्हाधिकारी सभागृहात पीकसर्व्हे कामाबाबत आयोजित अधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शेतकऱयांनी मोबाईल ऍप डाऊनलोड करून त्यात शेताचा सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर व पिकाची माहिती अपलोड करावी. यासाठी गावातील सुशिक्षित युवकांनी शेतकऱयांना मदत करावी. नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास या माहितीच्या आधारे शेतकऱयांना मदत करण्यास अनुकूल होणार आहे. प्रत्येक तीन दिवसांनी नोडल अधिकारी याची माहिती घेणार आहेत. पीक सर्व्हेचे काम वेळत पूर्ण करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी, महसूल निरीक्षक, तलाठी, बागायत व रेशीम खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी टी. भूबालन, अप्पर जिल्हाधिकारी महादेव मरगी, जिल्हा कृषी उपनिर्देशिका चेतना पाटील, उपनिर्देशक कोंगवाड आदी उपस्थित होते.