कमीत कमी व्याजासह समान ७ हाप्ते मध्ये पुर्नघटन करावे
प्रतिनिधी / असळज
महापूरामुळे गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून उसाच्या सुरळीत पाणी गेल्यामुळे ऊस कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झालेले आहे. सलग तीन वर्ष नैसर्गिक आपत्तीबरोबर महामारीमुळे गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतकऱ्यांनी विकास सेवा. संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका,यामधून घेतलेली पिककर्ज, वाहन, घर तारण, खावटी, पाईपलाईन, किसान सहाय्य, मोटर पंप खरेदी, ठिबंक सिंचन.
या कारणासाठी घेतलेली कर्ज परतफेड करणे या महापुराने शक्य नसलेने गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत देवून शिल्लक वसूल पात्र कर्ज रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान ७ हप्तेमध्ये पुर्नघटन करून जिल्हयातील शेतकऱ्यांचा हा मुलभूत प्रश्न शासनाने सोडवावा अशी मागणी गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.