अडवई, नानेली येथे लागवडीला सुरुवात. : मधुमेह, वजन घटविणे, अँन्टीऑक्सिडंट यावर उपयुक्त.प्रति किलो 600 भाव
उदय सावंत/अडवई.
सत्तरी तालुक्मयातील शेतकरी पारंपरिक लागवडींना बगल देत वेगवेगळय़ा प्रकारच्या लागवडीचा प्रयोग करुन त्या यशस्वी करत आहेत. साटरे येथे स्ट्रॉबेरी लागवड, लाल व पांढरा भेंडीची लागवड, कुमठोळ येथे भेंडीची लागवडीचा प्रयोग प्रयोग यशस्वी झालेले आहेत. त्याच्या पुढे जात प्रथमच काळय़ा भाताच्या लागवडीकडे सत्तरीतील शेतकरी वळले आहेत. भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई भागात जवळपास दोन हजार चौरस मीटर जमिनीमध्ये काळय़ा भाताच्या लागवडीचा प्रयोग सुरु आहे. आज वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या साहाय्यक अधिकाऱयांनी प्रत्यक्ष भेट देऊन भात लागवडीला सहकार्य केले. पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच सभासद उदयसिंग राणे यांच्या पुढाकाराने या भाताची लागवड करण्यात येत आहे. काळे तांदूळ हे मधुमेह, वजन कमी करण्यासाठी व शरीरातील लोह तत्व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्यामुळे त्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. येणाऱया काळात कृषी खात्याच्या माध्यमातून काळ्य़ा भाताच्या लागवडीला प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱयांनी दिली आहे.
2 हजार चौ.मी भुक्षेत्रात लागवड होणार.
वाळपईचे साहाय्यक कृषी अधिकारी समीर गावस यांनी सांगितले की, 2 हजार चौरस मीटर क्षेत्रांमध्ये काळ्य़ा भाताची लागवड करण्यात येणार आहे. एकेकाळी सर्वाधिक भात उत्पादन करणारा तालुका म्हणून सत्तरी तालुक्मयाची ओळख होती. मात्र रानटी जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे आज भात शेतीच्या जमिनीचे रूपांतर काजू लागवडीमध्ये झालेले आहे. यामुळे भाताचे उत्पादन जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर होते. यंदा काळय़ा भाताची लागवडीचा केलेला प्रयत्न आता हळूहळू यशस्वी होऊ लागलेला आहे. अडवई सत्तरीतील उदयसिंग राणे यांच्या जमिनीमधील एक हजार चौरस मीटर तर नानेली येथील गावकर यांच्या एक हजार चौरस मीटर जमीन क्षेत्रांमध्ये लागवड करण्यात येणार आहे.
भाताची लागवड झाली यशस्वी.
आज अडवई येथे भाताच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. यात गावातील नागरिक, महिला भगिनी, कृषी खात्याच्या वाळपई विभागाचे अधिकारी
समीर गावस, आत्मा योजनेचे रमेश गावकर, अनिरुद्ध गावठणकर आदी कर्मचाऱयानी भाग घेतला होता. उदयसिंग राणे यांनी सांगितले की, नव्या पद्धतीच्या भाताची लागवड केलेली आहे. कृषी अधिकाऱयांच्या माहितीनुसार याभाताची लागवड शेतकऱयांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण मधुमेह, वजन कमी करणे, ऍन्टीऑक्सिडंट अशा 25 प्रकाराचे फायदे याभाताचे आहेत. यामुळे या लागवडीला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
90 दिवसांचे पीक.
समीर गावस यांनी सांगितले की या भाताचे उत्पादन 90 दिवसांनी तयार होते. गावठी भातापेक्षा पंधरा दिवस आधी या भाताचे उत्पादन प्राप्त होत असते. यामुळे शेतकऱयांनी गावठी भात उत्पादित करण्याऐवजी काळय़ा भाताची लागवड करावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली. या भाताची उंची जवळपास कमरेपर्यंत येत असते. गतवषी गोव्याच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये वायंगणी स्वरूपात या भाताची लागवड करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सर्वप्रथम रत्नागिरी भागातून या भाताचे बियाणे आणण्यात आले होते असे यावेळी त्यांनी सांगितले. गेल्या वषी नानेली याठिकाणी या भाताचे उत्पादन करण्यात आले होते. सदर शेतकऱयाकडून सरकारने तीनशे रुपये प्रति किलो या भावाने सदर भाताचे बियाणे विकत घेतले असून सध्या वाळपई विभागीय कृषी कार्यालयाकडे जवळपास 200 किलो भाताचे बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱयांना याची आवश्यकता असेल त्यांनी घेऊन जावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
18 दिवसांनी तरवा झाला तयार.
याबाबत अधिक माहिती देताना भात उत्पादक उदयसिंग राणे यांनी सांगितले की 18 दिवसापूर्वी हे बियाणे रुजवण्यासाठी घातले होते. 18 दिवसांनी हा तरवा तयार झालेला आहे. यासाठी विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱयांच्या चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभलेले आहे. 1000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये जवळपास 350 किलो भाताचे उत्पादन होण्याची शक्मयता आहे.
बाजारपेठेत चांगला भाव.
याबाबत अधिक माहिती देताना समीर गावस यांनी सांगितले की बाजारपेठेमध्ये काळय़ा भाताला चांगल्या प्रकारची मागणी आहे. मुंबईसारख्या बाजारपेठेमध्ये प्रति किलो 500 रुपये अशा प्रमाणे भाव सुरू असून यामुळे शेतकऱयांचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. येणाऱया काळात गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात याभाताचे उत्पादन व्हावे व शेतकऱयांना आर्थिक दृष्टय़ा याचा फायदा व्हावा यासाठी कृषी खाते चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार असल्याचे समीर गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.