उदय सावंत / वाळपई
नैसर्गिक साधनसंपत्ती व कृषी साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या सत्तरी तालुक्मयात फणसाची मोठय़ा प्रमाणात लागवड पूर्वजांनी केली होती. त्या काळातही मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. मात्र या पिकाचा वापर व्यावसायिकदृष्टय़ा होत नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पिकाची हानी होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन फणसाच्या व्यवस्थापनासंदर्भात कौशल्यप्रणाली कार्यान्वित केल्यास या पिकाचा खऱया अर्थाने वापर होऊन त्याला व्यावहारिकदृष्टय़ा चांगले मार्ग उपलब्ध होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून याविषयीची कैफियत सरकारसमोर मांडण्यात येत आहे मात्र सरकारदरबारी अजूनही याविषयी जाग येत नसल्यामुळे सातत्याने फणसाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.
सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा भागांमध्ये फणसाची हजारो झाडे आहेत. एकेकाळी फणसाचा वापर या भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात खाण्यासाठी करीत होते. सध्या चटपटीत पदार्थ मिळत असल्यामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक खाद्याकडे दुर्लक्ष होत आहे. या नैसर्गिक खाद्याची जागा सध्यातरी फास्ट फूड, चायनीज फूड अशा पदार्थांनी घेतलेली आहे. यामुळे आताची पिढी नैसर्गिक खाद्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तरीही फणसाच्या पिकाची मोठय़ा प्रमाणात नासाडी होताना दिसत आहे. दुसऱया बाजूने मोठय़ा प्रमाणात या फणसाचा व्यावहारिक वापर होत नसल्यामुळे सत्तरी तालुक्मयात अशा प्रकारचे कौशल्य विकसित झाल्यास या फणसाच्या पिकाची मोठय़ा प्रमाणात व्यावहारिकदृष्टय़ा आर्थिक स्तरावर मदत होणार आहे.
फणसाच्या वापरासंदर्भात सरकारच्या संबंधित यंत्रणेकडून सत्तरी तालुक्मयातील मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेल्या महिला मंडळे व स्वयंसेवी गटांचा वापर केल्यास येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात फणसाच्या वापरासंदर्भात मोठय़ा प्रमाणात क्रांती निर्माण होणार आहे. मात्र सरकारकडून त्यासंदर्भात आवश्यक स्वरूपाचे कौशल्य विकसित होण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या फणसाचा वापर होत नाही.
फक्त वटपौर्णिमेलाच मोठी मागणी
फणसाचा वापर मोठय़ा प्रमाणात फक्त वटपौर्णिमेलाच करण्यात येतो. त्यामुळे सत्तरी तालुक्मयातील फणसाचा फक्त हा दिवस सोडल्यास इतर कोणत्याही दिवशी त्याला मागणी नसते. त्यामुळे फणस मोठय़ा प्रमाणात झाडावरच पिकून खाली पडण्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.
आजही प्रचंड प्रमाणात झाडावर लटकणारे फणस दिसत असतात. निसर्गाने मोठय़ा प्रमाणात फणसासारखी निर्मिती करून किमया केलेली आहे. मात्र याचा वापर माणूस व्यावहारिकदृष्टय़ा करत नाही तोपर्यंत त्याला खऱया अर्थाने बाजारपेठ उपलब्ध होणार नाही. वाळपईसारख्या भागात महामार्गाची संकल्पना नसल्यामुळे या फणसांना आवश्यक स्वरूपात बाजारपेठ उपलब्ध होत नाही. गोव्यातील सालसेत किंवा बार्देश भागातून महामार्गाची संकल्पना साकारण्यात आल्यामुळे सदर भागात मोठय़ा प्रमाणात या फणसांना बाजारपेठ उपलब्ध असते. मात्र सत्तरी तालुक्मयातून अशा प्रकारची बाजारपेठ अजूनही विकसित झालेली नाही.
‘सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस’ अशी फणसाची ओळख होऊ शकते. कापा आणि बरका असे याचे दोन प्रकार असतात. तरुणांसाठी कापा आणि वृद्धांसाठी बरका फणस. वृद्धांना उतारवयातील दातांच्या समस्येमुळे बरका फणस कधी पोटात गेला हेच कळत नाही. हा बरका फणसही रसरशीत चवदार असा असतो. हे असे फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊया.
फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.
पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.
फणसात मोठय़ा प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.
भरपूर प्रमाणात लोह असल्याने ऍनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचे ठरते.
थायरॉईडचा त्रास असणाऱयांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.
फणसात असलेले व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होऊ शकतो.
फणसात असणारे व्हिटॅमिन ‘ए’ डोळय़ांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीही तो फायदेशीर ठरतो.