अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई : सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती पुर्णवेळ करावी.
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिक संतप्त बनले आहेत. वाळपई पाणीपुरवठा कार्यालयाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. वाळपई येथे पूर्णवेळ साहाय्यक अभियंता नसल्याने इतर व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे दाबोस पाणी प्रकल्पातील व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
जोपर्यंत वाळपई पाणी पुरवठा कार्यालयांमध्ये पूर्णवेळ साहाय्यक अभियंत्याची नियुक्ती करण्यात येत नाही तोपर्यंत सत्तरी तालुक्मयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार नसल्याचा नागरिकांचा दावा आहे.
अनेक गावात पाणी टंचाई.
सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अनेकवेळा वेगवेगळय़ा गावातील महिलांनी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा आणला आहे. यावरुन पिण्याच्या पाण्याची समस्या किती गहन आहे याचा अंदाज येतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी व्यवस्थित नियोजन गरजेचे असून केवळ बैठका घेऊन काहीच फायदा होणार नसल्याचा नागरिकांचा दावा आहे.
आज ठाणे व म्हाऊस पंचायत क्षेत्राच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा एक वॉल्व बदलण्यात येत असल्यामुळे पाणी प्रकल्पाची यंत्रणा चार तास बंद होती. यामुळे ठाणे व म्हाऊस पंचायत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला पण पाणीपुरवठा हा असमाधानकारक असून यामुळे नागरिकांची गरज भागत नाही.
शनिवारी दाबोस प्रकल्प यंत्रणा चार तास बंद.
पाणी प्रकल्पाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी वॉल्व बदलण्याच्या कामासाठी प्रकल्पाची यंत्रणा चार तास बंद करावी लागली. यामुळे जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला नाही. यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
साहाय्यक अभियंत्याची पूर्णवेळ नियुक्ती करा
वाळपईचे साहाय्यक अभियंता सोमा नाईक यांच्याकडे सध्या पेडणे तालुक्मयाचा ताबा असल्याने ते दोन्ही ठिकाणी व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही. जोपर्यंत सहाय्यक अभियंता व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तोपर्यंत ही यंत्रणा जागेवर पडणे कठीण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे सरकारने वाळपईसाठी पूर्णवेळ सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
तर आगामी दोन महिन्यात परिस्थिती गंभीर.
पावसाळा अजून दोन महिन्याचा अवधी असताना सत्तरी तालुक्यातील जवळपास 50 टक्के गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. टंचाई दूर करायची असेल तर अधिकाऱयांनी व्यवस्थापन जागेवर घालण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सत्तरी तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होऊ शकतात.