कोरोना विषाणूच्या जागतिक फैलावामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्नांची साखळी समस्या निर्माण झालेली आहे. वेळीच त्यावर लक्ष देऊन योग्य ती पावले उचलली गेली पाहिजेत. विकासाचा अग्रक्रम देखील बदलावा लागणार आहे. बेरोजगारी, न्यून उत्पादन आणि औद्योगिक सेवा क्षेत्राच्या आकुंचनामुळे अर्थव्यवस्था शून्यावर जाण्याची शक्मयता आहे. ती किती वर्षे मागे जाईल हे आता सांगणे कठीण असले तरी ती कित्येक वर्षे मागे जाईल हे नक्की.
आरोग्य आणि अन्न समस्या यातील सहसंबंध बिघडत जात आहे. याचा परिणाम सबंध अर्थव्यवस्थेवर होतो. अन्नाची पुरवठा साखळी आणि अन्नधान्याचा व्यापार बिघडलेले आहेत. शेतकऱयांना पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. दलालांचा सुळसुळाट आणि ग्राहकांच्या अडचणी यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांच्या ग्राहक किमती गगनाला पोहोचल्या आहेत. शिवाय अर्थव्यवस्थेतील वेगवेगळय़ा अनुभवामुळे फळांच्या खरेदीवर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहकांकडून होणारी मागणी कमी होण्याकडे कल जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संबंध निर्माण केल्यास दलाल व त्यांच्या विचित्र स्वार्थी कृती नष्ट होतील. शेतकऱयांना चार पैसे जादा मिळायला लागतील. ग्राहकांना थेट शेतातून माल खरेदी करण्याचा आनंद प्राप्त होईल.
2008 च्या ईबोला व अविएन इन्फ्लुएन्झा या सांसर्गिक रोगामुळे जागतिक अन्न समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी गरीब, स्त्रिया, लहान मुले व वयस्क क्यक्तींच्या सत्त्वयुक्त अन्न आहाराच्या सेवनातील अभावामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. लोकसंख्येची गुणवत्ता खालावली जाण्याची शक्मयता अधिक असते. सुमारे 820 दशलक्ष लोकांना भुकेची समस्या सोडविता आलेली नसल्यामुळे हा वर्ग आणि नव्याने निर्माण होणारी अन्नसमस्या व अन्नाचे सत्त्व आणि गुणवत्ता यामुळे आरोग्याची स्थिती आणखी बिघडणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे अन्न आहाराच्या किमती न परवडणाऱया होतील. उच्च मूल्याच्या शेतमालाला मागणी कमी राहील. केवळ जगण्यासाठीच अन्नाला मागणी राहील. त्यामुळे अन्न सुरक्षितता असुरक्षितता आणि अव्यवस्थेकडे झुकेल. जगातील 150 दशलक्ष लहान मुलावर याचा विपरीत परिणाम होईल. हवामान बदलातील प्रभाव देखील नाकारता येणार नाही.
.न्युट्री फार्मिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे. अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कर्ब आणि फॅट देणारी अनेक पिके आहेत. विशेषत: मिल्लेट, पालेभाज्या, फळे वनस्पती पिकांची लागवड वाढविली पाहिजे. आरोग्यसंबंधीची जागरुकता निर्माण झाल्याशिवाय न्युट्रि फार्मिंगचे महत्त्व कळणार नाही. डाळिंबाचा रस, ईप्सॉम सॉल्ट, ब्राझील नट, व्हिटॅमिन डी-3 व अ साठी कॉडलिव्हर तेल, गाजराचा रस, करक्मयुमिन, (हळदीतील रसायन), मिरी, बीट, बायोबबल, यासारखे अनेक प्रक्रिया केलेले घटक शेतीतूनच निर्माण होतात. आजीबाईच्या बटव्यात अशाच काही घटकांचा समावेश असतो. त्यासंबंधीच्या शिक्षणाचा प्रसार आणि अंमलबजावणीमुळे प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्याच निर्माण होते, अशी अनेक औषधी पिके व प्रक्रिया केलेली औषधे शेतीतूनच उपलब्ध होतात.शेतकऱयांनी हे तंत्र लक्षात घेतले पाहिजे. कृषी संसाधनांची गुणवत्ता टिकवून शेती करता आली पाहिजे. काजूच्या टरफलामध्ये आयोडिन व ऍनाकार्डिक ऍसिड असते. या ऍसिडची किंमत रु. 49 लाखला एक किलो अशी आहे. पण त्याचे विघटन करण्याचे तंत्र माहीत नसल्यामुळे ते केवळ दहा वीस रु.त ते विकले जाते. अशा अनेक कृषी मालांमध्ये प्रक्रिया करून औषध निर्मिती होऊ शकते. माणसांच्या शरीरातील झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयोडिन हे चार महत्त्वाचे घटक प्रतिकार शक्ती निर्माण करतात. पण त्यांची कमतरता ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. सुमारे 79 टक्के लोकामध्ये झिंक व मॅग्नेशियमची कमतरता आहे. तृणधान्याच्या अधिक पसंतीच्या सेवनाने झिंकची कमतरता निर्माण होते. शरीरातील झिंक 50 टक्के पेक्षा कमी झाल्यास न्यूमोनिया होतो असा दावा क्लिनिकल न्युट्रिशन जर्नलने केला आहे. मॅग्नेशियममुळे माणसाला रिलॅक्स वाटते, स्ट्रेस निर्माण होत नाही. सेलेनियममुळे फुफ्फुसाला बळकटी मिळते. आपल्याकडील जमिनीमध्ये याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे याची कमतरता (200 एमसीजी) ही एक समस्या आहे. ब्राझील नटच्या सेवनामुळे फुफ्फुसाला बळकटी मिळते. अशीच स्थिती आयोडिनची आहे. केल्प वनस्पतीच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते. थायराईड ग्रंथी बळकट होतात.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अन्न सेवनाची साखळी निर्माण करून आपल्यातील प्रतिकार शक्ती विकसित केली पाहिजे. त्यादृष्टीने सत्त्व, नत्र आणि औषधी पिकांच्या संवर्धन आणि संरक्षणाची गरज आहे. भारतातील पारंपरिक आयुर्वेद, युनली, सिद्ध व होमिओपथी या तंत्राने प्रतिकार शक्ती कशी निर्माण होऊ शकते यासंबंधी जनतेचे प्रबोधन महत्त्वाचे आहे. स्वत:ला घरात कोंडून घेण्याने हा प्रश्न सुटेल पण प्रतिकारात्मक लस विकसित करणे आणि माणसातील प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी जैव विविधतेचा आणि औषधी वन उत्पादनाचा वापर वाढला पाहिजे. कृषी, तंत्रज्ञानाला या गोष्टी आव्हानात्मक नाहीत, पण त्यासंबंधीची जनजागृती खूप महत्त्वाची आहे. आरोग्य खात्याने यासंबंधी मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.
खते, बियाणे आणि कृषी साधनाचा पुरवठा वेळेवर व पुरेसा होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत प्रशासकीय जबाबदाऱया अधिक आहेत. कारण बरीच फसवणूक होऊ शकते. शिवाय अशा घटकांचा खुला व्यापार स्वीकारार्ह आहे. कृषी आदाने व साधनांच्या पुरवठय़ाच्या साखळीमध्ये सातत्य व स्थिरता निर्माण केली गेली पाहिजे. कृषी व्यवस्थेच्या विकासासाठी एप्रिल, मे व जून हे महिने खूप महत्त्वाचे आहेत. या क्षेत्रातील व या काळातील साखळी एकदा का तुटली तर येणाऱया रब्बी हंगामापर्यंत कृषी समस्येचे स्वरुप गंभीर होणार आहे. त्यासाठी प्राधान्याने आदान व कृषी साधनांच्या क्षेत्रावर लक्ष दिले गेले पाहिजे. या क्षेत्रातील फसवणुकीवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
डॉ. वसंतराव जुगळे :9422040684