ऑनलाईन टीम / मुंबई :
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले खरं काय आहे ते बाहेर येईल या भितीनं एनआयएकडे तपास देण्यात आला, असे पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
अन्यायविरोधत बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही, असे सांगत शरद पवार म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेलं नाही. त्यामुळे तपास होणं गरजेचं आहे. सत्य बाहेर येण्यासाठी एनआयटी स्थापन करण्याची मागणी मी केली होती. या गोष्टीची मागणी केल्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने याची चौकशी एनआयएकडे दिली.
समाजातील अत्याचाराविरोधात बोलले म्हणून नक्षलवादी ठरविण्यात आले. याची चौकशी करणे गरजेचे आहे. पोलिस अधिकाऱयांनी काय उद्योग केले, याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. असंही ते म्हणाले.