वार्ताहर/ कोगनोळी
सद्विचारांचे एकएक पाऊल चालत मैलाचे अंतर जाता येते. जन विचाराच्या संकल्पाने सामाजिक प्रगतीचे एक-एक पाऊल पुढे जाणार आहोत. जनमनावर परमाब्धी ग्रंथाद्वारे सद्विचारांचे बीज पेरले गेले आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मा – धर्माच्या लोकांचे सहकार्य लाभते आहे, असे प्रतिपादन प. पू. परमात्मराज महाराज यांनी केले.
आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित नूतन संस्थापित परमात्मराज अधि÷ान वंदूर या ट्रस्टच्यावतीने वंदूर (ता. कागल) येथे हॉस्पिटल उभारण्याविषयी नियोजित कार्यासंबंधी भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी संकल्प सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
ग्रंथाच्या भाषांतरासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक
परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, सर्वसामान्यांच्याकडून मिळत असलेल्या देणगीच्या ओघावरुन हॉस्पिटलच्या उपक्रमासाठी सर्वसामान्यांचा पाठिंबा आहे हे लक्षात येते. उन्हा-तान्हात कष्ट करणाऱया कष्टकऱयांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. लोकांची अढळ नि÷ा आहे म्हणून येथे केलेला संकल्प पूर्णत्वास जात असतो. नवीन वर्षाचा हा नवीन संकल्प आहे. सामाजिक कार्यासाठी तसेच परमाब्धी ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर होण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. वंदूर गाव सीमेवर आहे. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेचे सहकार्य लाभेल आणि त्या उपक्रमाचा सर्वांना उपयोग होईल, असेही आशावाद त्यांनी व्यक्त केला. दोन्ही राज्याच्या सरकारकडूनही फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रातील कार्पोरेट क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील कंपन्यांकडून, दात्यांकडून मोठय़ा प्रमाणात सहकार्य लाभेल. एटीजी सवलत मिळेल त्यामुळे हा उपक्रम सर्वांनाच फायदेशीर असल्याचेही परमात्मराज महाराजांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून एम. पी. पाटील (कावणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केलेले परमात्मराज महाराज यांचे मनोगत वाचून दाखविले. यावेळी शेकडो भाविकानी हॉस्पिटल उभारण्यासाठी देणगी दिली. त्या देणगीदारांचा प. पू. परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर हॉस्पिटल उभारणीसाठी वंदूर येथे एक एकर जमीन दान दिलेल्या सचिन धैर्यसिंह रणनवरे, धैर्यसिंह पांडुरंग रणनवरे, मेघमाला धैर्यसिंह रणनवरे, सुप्रिया धैर्यसिंह रणनवरे या संपूर्ण कुटुंबाचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी उद्योगपती गिरीश शहा-कोल्हापूर, शिवसिंह घाटगे-वंदूर, दुय्यम निबंधक एस. आर. माने, श्री पिस्ते-कोल्हापूर, सचिन शेटे-तासगाव, शिवाजी खोत, पोपट खोत, मारुती कोळेकर-हणबरवाडी, श्रीकांत महाजन-तासगाव, शोभा श्रीकांत पाटील-म्हाकवे, सुरेश अंकले-एकसंबा, अनिल कुलकर्णी-उगारखुर्द, ए. डी. चौगुले-राधानगरी, सुनिल कवठे-कागल, ज्ञानेश्वर वंटमोडे-चिकोडी, बाळासो पाटील-हंचिनाळ, भास्कर बाबर-आडी, डॉ. संजय मिरजे-बेनाडी, दिलीप दळवी-बेळगाव आदी भाविकांनी नियोजित हॉस्पिटलच्या कार्यासाठी देणगी दिली.
कार्यक्रमास उद्योगपती अजित पाटील, प्रसन्नकुमार गुजर, विनायक उर्फ अप्पी पाटील, शंकर पोवाडे, मलगोंडा पाटील-बंदूक, नीलकंठ मगदूम, बाळासो इस्पुर्ले, आप्पासो पाटील आदी मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते.